HW News Marathi
महाराष्ट्र

ऑल द बेस्ट ! दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून (३ मार्च) सुरुवात होत आहे. परीक्षेचा कालावधी ३-२३ मार्च असा असणार आहे. यावर्षी राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. यात, ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थीनींचा सहभाग आहे. २०१९ च्या तुलनेत या वर्षी ६५ हजार परीक्षार्थींची वाढ झाली आहे.

परीक्षेदरम्यान कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी राज्यभरात एकूण २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके गैरमार्गाशी लढा या नावाने कार्यरत असणार आहेत. तसेच, यात महिलांचे एक विशेष भरारी पथक काम करणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निरसण करण्यासाठी हेल्पलाईनही तयार करण्यात आली आहे. ही हेल्पलाईन विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही २४ तास मदत आणि मार्गदर्शन करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट!

विद्यार्थ्यांसाठीच्या महत्त्वाच्या सुचना-

  • विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहणे
  • सकाळी पेपर असल्यास १०.३० वाजता, तर दुपारी पेपर असल्यास २.३० वाजता केंद्रावर हजर राहणे
  • उत्तरपत्रिकेची अदलाबदल होऊ नये म्हणून पुरवण्या ल उत्तरपत्रिकेवर बारकोड असणार
  • प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या सहीने उघडणार

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारण करून लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSCची १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलली

News Desk

प्रभाकर साहिलच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता; सीआयडी चौकशी करा! – महेश तपासे

Aprna