HW News Marathi
महाराष्ट्र

दहावीचा निकाल जाहीर, एकूण राज्याचा निकाल 99. 95 टक्के

मुंबई | इय्यता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल ९९. ९५ टक्के, कोकण विभागाचा निकाल १०० टक्के, मुलांचा निकाल ९९.९४ टक्के, तर मुलींचा निकाल ९९.९६ टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल.

१५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण

एकूण १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण

राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ४८ हजार ६८३ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार

मुलांचा निकाल ९९.९४ टक्के,

मुलींचा निकाल ९९.९६ टक्के

१२ ३८४ शाळांचा निकाल १००%

४९२२ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही.

विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर

एकूण आठ माध्यमांतर्गत २०२०-२१ वर्षातील एसएससी (इयत्ता दहावी ) परीक्षेला एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी ९ लाख ०९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये इ. १० वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण जाहीर केले जातील.

निकाल कुठे पाहता येईल

2021 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण https://result.mh-ssc.ac.in, https://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

वेबसाईट :

https://result.mh-ssc.ac.in/

https://mahahsscboard.in/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुकवर पोस्ट टाकून मराठा तरुणाची आरक्षणासाठी आत्महत्या

swarit

‘त्या’ सुसाईड नोटमध्ये नामोल्लेख असलेल्या लोकांचा राष्ट्रवादीशी काडीमात्र संबंध नाही !

News Desk

आषाढी यात्रेसाठी उद्यापासून पालख्यांचं प्रस्थान, भाजप अजूनही पायी वारीवर ठाम

News Desk