HW News Marathi
महाराष्ट्र

“आता एसटी बस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार”

मुंबई | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले आहेत. आजपासून हे निर्बंध लागू करण्यात आले असून १ मेपर्यंत लागू असणार आहेत. या पार्शभूमीवर आज (२२ एप्रिल) राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना एक महत्वपूर्ण माहिती दिली. एसटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी अनिल परब म्हणाले ”जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेर देखील चालतील परंतु त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार आहेत.या संदर्भात एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल? याची चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल. परंतु आता सरकारने ज्या काही गाइडलाईन्स दिलेल्या आहेत, त्यानुसार दोन्ही ठिकाणी एसटी चालतील फक्त या एसटी बस अत्यावश्यक सेवेसाठीच चालतील.”

”त्या संदर्भात आता जे काही निकष आहेत, जिल्हाबाहेरील लोकांना येण्यासाठी किती दिवस विलगीकरणात ठेवयाचं? कशा पद्धतीने ठेवायचं? त्यांच्या हातावर शिक्के कसे मारायचे? या सगळ्या गोष्टींच्या निर्णयासाठी मंत्रालयाब बैठक होणार आहे. एसटी संख्या देखील कमी होईल, कारण नेहमीप्रमाणे एसटी चालणार नाहीत. गाइडलाईन्सचे तंतोतंत पालन केले जाईल. एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जर लोकं जाणार असतील, तर सरकारने म्हटल्यानुसार त्यांना हातावर शिक्के मारून १४ दिवस विलगीकरणात रहावं लागेल.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत म्हणतात…

News Desk

शिरीष कुलकर्णी यांनी पोलिसांना शरण यावे | मुंबई हायकोर्ट

News Desk

लोकप्रतिनिधींना मतदारसंघात धरण नाही झाले तरी चालेल, पण मेडिकल कॉलेज पाहिजे – अमित देशमुख

News Desk