HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी संपाला भोकर तालुक्यात हिंसक वळण

मुंबई | लालपरी कर्मचारी म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला भोकर तालुक्यात हिंसक वळण लागले असून दोन गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाला संमिश्र प्रतिसाद असून काही आगाराच्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत आहेत.

शुक्रवारी सकाळी ८ वाजता भोकर आगारातून भोकर – नांदेड ही बस (क्र.एम.एच.०६ एस ८७६३) प्रवाश्यांना घेऊन निघाली. बस भोसी जवळ आली असता अज्ञात आंदोलकांकडून बसवर दगडफेक करण्यात आली. यात बसच्या पाठीमागील बाजूची काच फुटली तर दुसऱ्या एका घटनेत हदगाव आगाराच्या भोकर – हदगाव या बसवर (क्र. एमएच २० डी ९८१७) भोकर शहरात अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. यात बसची समोरची काच फुटली. दोन्ही घटनेत कोणालाही इजा झालेली नाही

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

समान सत्तावाटपातही इतके वाट्यास आले नसते, सामनातून काँग्रेसवर बोचरी टीका

News Desk

करुणा शर्मां यांच्या जामिनाचे काय झाले? काय आहे न्यायालयाचा निर्णय?

News Desk

“शेवटी माझ्या लेकालाच वाटलं मला इथे आणावं”, आदित्य यांना जवळ करत उपमुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना टोला

News Desk
महाराष्ट्र

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चार नव्या आरोपींची छायाचित्रे जारी

swarit

पुणे | कोरेगाव भीमा हिंसाचार व हत्येप्रकरणी आता आणखी चार आरोपींची छायाचित्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जारी केली आहेत. १ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमामध्ये उफाळलेल्या हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून ३ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता गुन्हे अन्वेषण विभागाने आणखी चार नव्या आरोपींची छायाचित्रे जारी केली आहेत.

विशेष म्हणजे यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघांनीही राहुलची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तिन्ही आरोपी अहमदनगरचे आहेत. ११ जानेवारीपर्यंत या संपूर्ण प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या ५१ वर पोहोचली. १0 जानेवारी रोजी दिवसभराच्या कारवाईनंतर पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली होती. त्यात राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी तिघांना तर उर्वरित पाच जणांना सणसवाडीतल्या हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आली होती.

 

Related posts

“पडळकर, खोत कमी पडले!”; ST कर्मचाऱ्यांबाबत Anil Parab यांचं विधान

News Desk

महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य; राजू शेट्टी बाहेर पडण्याचं कारण नव्हते! – जयंत पाटील

Aprna

जिल्ह्याच्या बाहेरही बस सेवा होणार सुरू, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk