HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पक्का, पहा कुणाची खुर्ची आहे धोक्यात ?

मुंबई | महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर पक्का झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. १२ किंवा १३ ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे . राज्य मंत्री मंडळाच्या या विस्तारामुळे अनेक मंत्र्यांच्या खूर्चीला धक्का पोहचणार असल्याची चर्चा आहे.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, या मंत्र्यांची खुर्ची धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. तसेच आमदार आशीष शेलार, आमदार संजय कुंटे, आमदार अनिल बोंडे आणि आमदार भाई गिरकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

सध्या मंत्रिमंडळात भाजप कोट्याच्या चार जागा खाली असून शिवसेनेच्या कोट्यामधील सर्व जागा भरलेल्या आहेत. मात्र शिवसेनेच्या कोट्यातले आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची विधान परिषदेची मुदत संपत असल्यामुळे शिवसेनेकडे एक जागा राहणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे याठिकाणी कुणाची वर्णी लागते हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गर्दीचे कार्यक्रम सुरु, आमच्यावर गुन्हा का? पंकजा मुंडेंचा सवाल

News Desk

“नारायण राणे कुठेही गेले तरी, लोकं तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार”

News Desk
देश / विदेश

ओडिशा, आंध्र प्रदेशात ‘तितली’ चक्रीवादळाचा हाहाकार

swarit

भुवनेश्वर | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने ‘तितली’ या चक्रीवादळाचे भयानक असे रुप धारण केले आहे. हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ १६५ किलोमीटर प्रतितास वेगाने किनारपट्टीकडे येत आहे. त्यामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. या चक्रीवादळात दोघांचा मृत्यू झाला आहे.

तितली हे चक्रीवादळ ओडिशातील गोपालपूरमध्ये दाखल झाले असून या ठिकाणीची अनेक झाडे कोसळली आणि विजेचे खांब पडेल आहेत. ओडिशामध्ये हायअलर्ट जारी करण्यात आले असून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. या प्रशासनाने आतापर्यंत ३ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आले आहेत.

Related posts

राफेल करार चौकशीचा फ्रान्स सरकारचा निर्णय

News Desk

जाणून घ्या… भारतात कोणकोणत्या राज्यात किती ‘कोरोना’बाधित ?

swarit

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करायची वेळ येते हे दुर्दैवच ! उदयनराजे संतापले

News Desk