HW News Marathi
महाराष्ट्र

गुढीपाडव्याआधीच जनतेसाठी गुडन्यूज! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठवले

मुंबई |  कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमातने मंजूर झाल्याची माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत दिली आहे. गुढीपाडव्या आधी सरकारने राज्यातील जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटले, “आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले ……गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्सहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा.” 

  

दरम्यान, महाराष्ट्र आता निर्बंधमुक्त झाला असून मास्क घालणे हे एच्छिक असेल, अशी माहितीही आव्हडांनी एबीपीशी बोलताना दिली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून कोणतेही सण साजरे करता आले नाही. परंतु,आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंधमुक्त करण्यात आले आहेत. परंतु, राज्यत १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत रात्री संजारबंदी लागू केली होती. आणि राज्यात गुढीपाडवाच्या शोभायात्रा, रामनवमी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजऱ्या होण्यावर विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. परंतु, आता राज्यात कोरोना निर्बंधमुक्त झाल्यामुळे सर्व सण आता जनतेला उत्साहत साजरा करता येणार आहेत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्षा राऊत एक दिवसाआधीच ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर

News Desk

जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार!

News Desk

“गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास…” संजय राऊत यांची मोठी घोषणा!

News Desk