HW News Marathi
Covid-19

राज्यात आतापर्यंत ४ लाख ३८ हजार ७५१ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

मुंबई | कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. घरपोच मद्यविक्री ही १५ मेपासून ते २८ मेपर्यंत या काळात ४ लाख ३८ हजार ७५१ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. काल (२८ मे) दिवसभरात ५५ हजार ३६८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ३० हजार ७०७ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ७,१७६ अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने ३ मेपासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहे. राज्यात १५ मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावरऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. १ मे ते २६ मे या काळात १ लाख ७ हजार ९८ ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळविण्यासाठी अर्ज केले होते. यापैकी ९२ हजार ६१२ ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येतअसलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असूनआता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीद्वारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पद्धतीने सुद्धा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु. १०० किंवा आजीवन परवान्याकरीता रु. १,००० एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी न करता मद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घ्यावा.

२४ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. २६ मेरोजी राज्यात ९२ गुन्हे नोंदविण्यात आले असून ३६ आरोपींना अटक करण्यात आली असून ३१ लाख ३४ हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यात २४ मार्चपासून २६ मेपर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ६,४२४ गुन्हे नोंदविण्यात आले असून २,९९४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ६३५ वाहने जप्त करण्यात आली असून १७ कोटी ३३ लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज ४७, १९० वर

News Desk

येत्या आठवड्यापासून पुण्यातील निर्बंधही शिथिल होणार!

News Desk

लाॅकडाऊनमध्ये सूट देणे पुणेकरांना परवडणार नाही !

News Desk