HW News Marathi
Covid-19

रेल्वे प्रशासनाने कामगारांकडून पैसे घेऊ नये !

मुंबई | “रेल्वे प्रशासना म्हणतेय की परप्रांतीय मजूरांकडून प्रवासाकरीता तिकीट आकारले जाणार नाही. कारण केंद्र ८५ टक्के खर्च उचलेल पण महिनाभर लॉकडाऊनमुळे काही न कमावलेल्या मज़ूरांना आता ही पूर्ण प्रवास भाडे भरूनच तिकीट घ्यावे लागते,” असा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट केले आहे केला आहे. यात देशमुख पुढे म्हणाले, “गरीबांबद्दल रेल्वे प्रशासनाने मानवतेने विचार करावा ही विनंती,” त्यांनी ट्वीमध्ये म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहात लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, देशातील इतर राज्यात श्रमिक आणि मंजूर अडकून पडलेले होते. या सर्वांना पुन्हा त्यांचा मुळे गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने विषेश श्रमिक ट्रेनची सोय केली आहे. मात्र, केंद्र सरकारकडून रेल्वे तिकिटात ८५ टक्के सवलत देण्यात आल्याच्या बातम्या काल (५ मे) प्रसारित झाल्या होत्या, हे संपूर्ण वृत्त खोटे असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी व्हिडिओमधून केला आहे. ‘तिकिटातील सवलतीचे असे कोणतेही आदेश रेल्वे खात्याने काढलेले नाहीत. आजही कामगारांना स्वत:च्या खिशातील पैसे देऊन पूर्ण तिकीट काढावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट आहेत. त्यामुळे अशा परिस्थिती रेल्वे प्रशासनाने कामगारांकडून पैसे घेऊ नये, अशा असे विनंती देशमुख यांनी केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीकरण्याच्या दुसऱ्या टप्प्यात लस टोचून घेणार

News Desk

पुण्यात ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार ! महापौर मोहोळ

News Desk

राज्यात कोरोनाधितांचा आकडा ५२१८ तर पुण्यात आत्तापर्यंत ८७ कोरोमामुक्त

News Desk