HW News Marathi
महाराष्ट्र

भोंग्यासंदर्भात सर्व संघटना आणि विरोधकांशी चर्चा करून नियमावली जाहीर करणार! – दिलीप वळसे पाटील

मुंबई | भोंग्यासंदर्भात सर्व संघटना आणि विरोधकांशी चर्चा करून नियमावली जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट असल्याचा आरोपही गृहमंत्र्यांनी आज (२० एप्रिल) पत्रकार परिषदेतून केला आहे. कोणही कायदा हाता घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन गृहमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना केले. 

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “धार्मिक तेढ निर्माण झाल्यास कोठोर कारवाई करण्यास येईल. कोणही कायदा हाता घेण्याचा प्रयत्न करू नये. भोंग्यासंदर्भात सर्व विरोधी पक्षाशी चर्चा करणार आहे. सर्व संघटना आणि विरोधकांशी चर्चा करून भोंग्यासंदर्भात नियमावली जाहीर करणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पुढे गृहमंत्री म्हणाले, मशिदीमध्ये सीसीटीव्ही लावण्यास विरोध नाही, धार्मिक स्थळावर सीसीटीव्ही लावणे ऐच्छिक आहे.” 

भोंगे लावणे आणि उतरवणे हे सरकारचे काम नाही 

भोंगे लावणे आणि उतरवणे हे सरकारची जबाबादारी काम नाही. राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेसंदर्भात स्थानिक पोलीस निर्णय घेतील. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट आखला जात असल्याचा आरोपही गृहमंत्र्यांनी केला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज नाही – शरद पवार 

News Desk

मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं – अजित पवार

News Desk

बोगस FIR प्रकरणी सोमय्या आज राज्यपालांची घेणार भेट

Aprna