HW News Marathi
महाराष्ट्र

एखाद्याला राजकारणातून नव्हे तर जीवनातून उठवण्यासाठीचे सध्याचे राजकारण सुरू!; धनंजय मुंडेंचा विरोधकांवर निशाणा

बीड | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील विरोधकांवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना आज (१ मार्च) धनंजय मुंडे म्हणाले, “राज्याच्या अधिवेधनाच्या आधीची परिस्थिती आणि अधिवेशनाच्या नंतरची परिस्थिती याचा आपल्याला कदाचित मागच्या अनेक अधिवेशनपासूनचा अनुभव पाहायला मिळाला असेल. अधिवेशन आले की सत्ताधारी हे विरोधकांना दाबायचा प्रयत्न करायचे. मी गेली पाच वर्षे विरोधी पक्षात होतो. त्यामुळे, ते मी अनुभवलेलं आहे. आता मागच्या अडीच वर्षात सत्ता बदलली. सत्तेतले विरोधी पक्षात गेले आणि विरोधी पक्षातले सत्तेत आले. मात्र, आज ते सुद्धा त्याच पद्धतीने अधिवेशनाच्या आधी अतिशय विंडेकटीव्ह पध्दतीने राजकारण करत आहेत.”

धनंजय मुंडे पुढे म्हणाले कि, “एखादा विचार एखादा माणूस राजकारणातून नाही तर जीवनातून कशा पद्धतीने उठवायचे यासाठी हे सुरु आहे. हे जे काही राजकारण सुरू आहे हे फार चुकीचे आहे. हे अधिवेशन आहे. अधिवेधशनाच्या अगोदर आणि अधिवेशनाच्या नंतर सध्या राजकारणात हे जे चालू आहे ते काही बरोबर नाही. हे अधिवेशन आहे इथे सार्वभोम सभागृहात सर्वांना आपली मते मांडण्याचा विचार मांडण्याचा अधिकार आहे. विरोधी पक्ष आपली मते मांडेल आणि आम्ही सत्ताधारी पक्ष त्याच्या प्रशांची उत्तरे समर्थपणे देऊ आणि त्यांचे समाधानही करू”, असे माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी” अजित पवारांची सभागृहात मागणी

Aprna

धनंजय मुंडेंनी पाळला महाविकास आघाडीचा धर्म!

News Desk

पोलीस पाटी व चिन्ह असलेले स्टिकर्स लावल्याचे आढळल्यास वाहनांवर होणार कारवाई

Aprna