HW News Marathi
महाराष्ट्र

थांबा.. अभ्यास सुरू आहे, पूर्ण होताच कॉंग्रेस सोडू -राणे

पी.रामदास : काही काळ कळ काढा, अभ्यास सुरू आहे. तो पूर्ण होताच पक्षांतर करू. असे संकेत ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नारायण राणे कॉंग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेस सोडण्याची मानसिक तयारी त्यांनी कधीच केली आहे, परंतु काही बाबी अद्याप स्पष्ट होत नसल्याने त्यावर त्यांचा सखोल अभ्यास सुरू आहे, तो पूर्ण होताच पक्षांतर अटळ आहे. परंतु राणे नेमका कशाचा अभ्यास करत आहेत, याचे कोडे अद्याप कुणालाही सोडते आलेले नाही. महाबातमीने तो सोडवण्याचा प्रयत्न केला असता काही तत्थ व निष्कर्ष बाहेर आले आहेत.

राणे भाजपमध्ये दाखल होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये जावून राणेंनी अमित शहा यांची भेट पक्षांतराचे स्पष्ट संकेत दिले आहेत. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात राणे यांनी संघाचे नेत्यांवर केलेले भाषण पाहता, त्यांनी मनोमन संघ, भाजप परिवाराची विचारसरणी स्वीकारल्याचे जाणवते. दीनदयाळ उपाध्याय यांच्यावर केलेले भाषण त्यांच्या अभ्यासाची चुणूक दाखवतात.

मुंबईत धडकलेल्या मराठा मोर्चाचे राजकीय प्रतिनिधी म्हणून राणे यांनी महत्वाची भूमिका निभावून सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या सर्व घटना घडामोडी पाहता, राणे सध्या शरीराने कॉंग्रेसमध्ये असले तरी मनाने ते भाजपवासिय झाले आहेत.

भाजपमध्ये उघडपणे प्रवेश केल्यास काय फायदा होईल किंवा किती तोटा होवू शकतो, याचा अभ्यास राणे करत आहेत. भाजपमध्ये दाखल झाल्यास महसूल किंवा गृहमंत्रालय राणेंना मिळण्याची शक्यता आहे. परंतु वयाने ज्युनिअर असलेल्या मुख्यमंत्र्यासोबत काम करणे संयुक्तिक ठरेल का, याचाही अभ्यास सुरू आहे. दुसरा पर्याय म्हणजे राणे यांना प्रदेशाध्यक्षपद दिले जावू शकते, कारण रावसाहेब दानवेंनी आपल्या सुमार वक्तव्याने पक्षाला अडचणीत आणले आहे. त्यांच्या जागी मराठा कार्ड म्हणून राणेंची वर्णी लागु शकते. त्यांची आक्रमक शैली आणि त्यांच्या चाहत्यांसाठी ही बाब निश्चितच आवडू शकते. याचा भाजपचे धुरिण साकल्याने विचार करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राणेंचे वय, राजकीय अनुभव पाहता, त्यांना केंद्रात संधी मिळू शकते, परंतु मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांच्या कितपत निभाव लागले, याबाबत शंका आहे. त्यामुले ते राज्याच्या राजकारणातच राहण्याचा विचार करत आहेत.

दोन वर्षानंतर विधानसभेच्या निवडणूका लागतील. त्यावेळी भाजपची काय परिस्थिती राहिल, याचाही राणे अभ्यास करत आहेत. कारण भाजप पुन्हा सत्तेत न आल्यास आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी स्थिती होवू नये, अशी शंका त्यांना सतावत आहे. येत्या दोन वर्षात पुन्हा वारे फिरले तर कॉंग्रेसला अच्छे दिन येवू शकतात, त्यावेळी पक्षात राहिलो नाही तर मोठी संधी हातची जाण्याचीही भीती आहे, त्यामुळे राणे यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे, त्यालाच ते अभ्यास म्हणत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसने राज्यात जुन्या चेहऱ्यांना मेकअप करून नव्याने पुढे आणले !

News Desk

काही जण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीड मध्ये येतात, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर हल्ला बोल

News Desk

आता ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही! नाना पटोले

News Desk