HW News Marathi
महाराष्ट्र

कृषी कायद्यावर राष्ट्रपतींचे अजब विधान! कॉंग्रेसची टिका…

मुंबई | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणात कृषी कायद्यांचं समर्थन केलं त्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्यावर टिका केली आहे. संयुक्त बैठकीत बोलताना राष्ट्रपतींनी सर्व संकेत व प्रथा बाजूला ठेवून केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे देशातील करोडो गरिब व मध्यम शेतकऱ्यांना फायदा झाला असे बेधडक विधान केले आहे,अशात वस्तुस्थिती अशी आहे की हे कायदे संसदेत पास झाले असले तरी उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या अंमलबजाणीसाठी आवश्यक नियमावली अजून तयार नाही. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे आणि केंद्र सरकार त्यात आवश्यक त्या सुधारणा, एवढेच नव्हे तर त्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास देखील तयार आहे. अशा परिस्थितीत करोडो गरिब व मध्यम शेतकऱ्यांना या कायद्यामुळे फायदा झाला, असे राष्ट्रपती महोदय कशाच्या आधारे म्हणत आहेत ? की सरकारने लिहून दिले ते जसेच्या तसे वाचले ? असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

News Desk

आत्तापर्यंत मी सरकार सकारात्मक असल्याचं म्हणत होतो पण आता गडबड वाटतेय!

News Desk

एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठित समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार! – अनिल परब

Aprna