HW News Marathi
महाराष्ट्र

#NirbhayaCase : चारीही आरोपींना एकत्रित फाशी देण्याच्या याचिकेवर ११ फेब्रुवारीला सुनावणी

नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना एकत्रित फाशी देणार, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी (५ फेब्रुवारी) दिला होता. मात्र, न्यायालयाच्या त्रिसदस्यीय घटनापीठासमोर केंद्राच्या याचिकेवर आज (७ फेब्रुवारी) सुनावणी पार पडली. त्यावेळी घटनापीठाने याचिकेवरील सुनावणी ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही. रमण, न्या. संजीव खन्ना, न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर हे अपील दाखल करण्यात आले आहे. नटराज यांनी सांगितले की, दोषी व्यक्तींनी केलेल्या पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. या दोषींनी केलेले क्युरेटिव्ह तसेच दयेचे अर्जही फेटाळले गेले आहेत. असे असूनही फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करणे तिहार तुरुंगाधिकाऱ्यांना अशक्य झाले आहे.

“निर्भया प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी कोणत्याही औपचारीकता आता बाकी नाहीत. तरी देखील न्यायालयाने डेथ वॉरंट जारी करण्यात केले नाही. हा आमच्यावर अन्याय आहे. आता न्यायालयानेही आरोपींना आणखी किती वेळ देणार आहे? सरकारचा या सगळ्याला पाठिंबा आहे का? ” असे सवाल निर्भयाची आई आशादेवीने उपस्थित केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नव्हता” – महापौर किशोरी पेडणेकर

News Desk

अनिल देशमुखांनी भाजपवर केलेल्या ‘त्या’ आरोपाचे गिरीश महाजनांनी केले खंडन

Aprna

मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे ‘कोरोना रुग्णालया’त रुपांतर !

News Desk