HW News Marathi
महाराष्ट्र

“आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं… त्यात गैर काय?” 

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या मनातली मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी जाहीरपणाने मुख्यंमंत्रिपदाविषयी इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. राज्याचे उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटलांना शुभेच्छा दिल्या तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांना शुभेच्छा देत कोणाला मुख्यमंत्री व्हावसं नाही वाटत असं म्हटलं.

राजकीय जीवनात काम करत असताना इच्छा आकांक्षा असतात. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर अजितदादा बोलले आहेत. त्यांनी त्यांच्या इच्छेला पाठिंबा दिला आहे. आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं… त्यात गैर काय?”, अशी खास प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

“उद्या मला वाटलं तर काय करु?” – शरद पवार

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे, मराठा आरक्षण, महाविकास आघाडी सरकार, जयंत पाटील यासारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यास पत्रकाराने सुरुवात केली. त्यावर “मग काय झालं काय?” असा उलट प्रश्न पवारांनी विचारला. “काही संधी आहे का?” असं विचारत पत्रकाराने आपला प्रश्न पूर्ण केला. तेव्हा “उद्या मला वाटलं तर काय करु? मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही” अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली आहे.

काय म्हणाले होते जयंत पाटील?

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी जास्त संख्याबळाची, पक्षवाढीची गरज असते. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. त्यासाठी पक्षवाढीची अतोनात गरज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी कधीही मातोक्षीवर फोन केला नाही”, नारायण राणेंचे विनायक राऊतांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

News Desk

मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले – जयंत पाटील

News Desk

या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आहे, राणेंची मुख्यमंत्र्यावर जहरी टीका  

News Desk