HW News Marathi
महाराष्ट्र

आंबिल ओढ्यातील नागरिकांशी संवाद, सुप्रिया सुळेंसमोरच अजित पवार मुर्दाबादच्या दिल्या घोषणा

पुणे | पुण्यातील आंबिल ओढा परिसरात असलेल्या स्थानिकांच्या घरावर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत ५ घरं पाडण्यात आली होती. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पाडापाडी थांबण्यात आली होती. मात्र, या कारवाईचे पडसाद आणि नारगिकांचा आक्रोश अजूनही कायम आहे. घरं पाडण्यात आलेल्या स्थानिकांनी पुणे महानगरपालिकेच्या समोर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल सुळे यांनी माहिती घेतली. यावेळी आंदोलकांनी कारवाई का करण्यात आली, पुन्हा घरं बांधून देण्याची मागणी केली. त्याचबरोबर घरं पाडल्याबद्दल अजित पवार मुर्दाबाद, पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी घोषणाबाजी केली.

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात राहणाऱ्या स्थानिकांच्या घरांवर महापालिकेनं गुरुवारी हातोडा चालवला होता. गुरुवारी पहाटे महापालिकेनं पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. या कारवाई दरम्यान नागरीक आणि स्थानिकांमध्ये संघर्ष होऊन तणाव निर्माण झाला होता. प्रचंड गोंधळानंतरही महापालिकेनं कारवाई सुरूच ठेवली होती. सुरुवातीला कारवाईच्या आदेशाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. बिल्डरनेच कारवाई केल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. मात्र, नंतर महापालिकेनं कारवाईची जबाबदारी घेत स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान, या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली असून, पाडण्यात आलेल्या घरांवरून स्थानिक आक्रमक झाले आहेत.

स्थानिकांनी आज (२८ जून) सकाळी पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केलं. यावेळी मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलकांची भेट घेतली. आंदोलनस्थळी जाऊन सुप्रिया सुळे आंदोलकांकडून कारवाईबद्दल आणि कारवाई करताना झालेल्या घडामोडींची माहिती घेतली. घरं पाडण्यात आलेल्या महिलांचं म्हणणंही त्यांनी ऐकून घेतलं. सुप्रिया सुळे घरं पाडण्यात आलेल्या पीडितांशी चर्चा करत असताना आंदोलकांकडून जोरजोरात घोषणाबाजी करण्यात येत होती. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याविरोधातही आंदोलकांनी घोषणाबाजी केली. इतकंच नाही, तर त्यांच्या पालकमंत्री पदाच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

पाऊस सुरू झाल्यानंतर आणि करोनाचं संकट असताना महापालिकेनं कारवाई का केली?, अशी विचारणा आंदोलकांनी केली. त्याचबरोबर पाडण्यात आलेली घरं बांधून देण्यात यावी, अशी मागणी करत आंदोलकांनी घोषणा दिल्या. यावेळी प्रताप निकम नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत आंदोलकांनी गंभीर आरोप केला. “महापालिकेच्या आयुक्तांसमोर निकमने ‘मी अजित पवार यांचा माणूस आहे. मला कुणीच काही करू शकत नाही’ असा इशारा दिला, असंही आंदोलक सुप्रिया सुळेंशी बोलताना म्हणाले आहेत.

आंबील ओढ्याची थोडक्यात माहिती

आंबील ओढा हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक ओढा आहे. आंबील ओढ्याची सुरुवात कात्रज तलावापासून होते. पेशव्यांच्या कारकिर्दीत आंबील ओढा ही पुण्याची पश्चिमेकडील सीमा समजली जायची. या ओढ्याकाठी इतिहासकाळात एक जागृत जोगेश्वरी मंदिर होते. सध्या आंबील ओढ्याच्या काठी कात्रज, धनकवडी, बालाजी नगर, पद्मावती, सहकारनगर, पर्वती, आंबील ओढा वसाहत, दांडेकर पूल वसाहत, राजेंद्र नगर, दत्तवाडी असे परिसर वसले आहेत. आंबील ओढा वैकुंठ स्मशान भूमीच्या मागील बाजूस मुठा नदीला मिळतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगडसह राज्यभरात मुसळधार पावसाची हजेरी

Aprna

तुम्ही फक्त ‘घाबरत नाही’ सांगा, मग आम्ही उद्यापासून…!; आता मलिकांचा शेलारांना मोठा इशारा

News Desk

अशा परिस्थितीत कारवाई केल्याने लोकांच्या मनात शंका – शरद पवार

News Desk