HW News Marathi
देश / विदेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना अटक

कोल्हापूर । मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांविरोधात आज (६ फेब्रुवारी) शेतकऱ्यांचे देशव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, कोल्हापुरात देखील दाभोळकर कॉर्नर परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पोलिसांनी अटक केली आहे. “केंद्र सरकारने तात्काळ हे कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. ज्या ठिकाणी केंद्र सरकारला अडवावे लागेल त्या ठिकाणी आम्ही आडवणार. तसेच येत्या काही काळात थेट राजभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा निघेल”, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे.

“गरज पडल्यास महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीवर स्वार होईल”, असाही इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांविरोधात देशात गेल्या २ महिन्यांहूनही अधिक काळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, एकीकडे संसदेत हा मुद्दा गाजत असतानाच आज (६ फेब्रुवारी) शेतकऱ्यांनी देशभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वळगून देशभर दुपारी १२ ते ३ या वेळेत आज शेतकऱ्यांचा चक्काजाम असेल. मात्र, याच आंदोलनात सहभागी झालेल्या राजू शेट्टी यांना आता पोलिसांनी अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

News Desk

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्या पत्नी चिन्ना दुआ यांचं निधन

News Desk

दिल्लीत राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि शरद पवारांची भेट, राजकीय घडामोडींना वेग!

News Desk