HW News Marathi
महाराष्ट्र

८० वर्षाचा योध्दा शेतकर्‍यांची दु:ख समजून घेण्यासाठी त्यांच्या बांधावर,पहिल्या दिवशी दहा ते बारा नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी !

तुळजापूर | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील गावांना भेटी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेतकर्‍यांचे दु:ख जाणून घेतले आणि धीरही दिला.

रविवार आणि सोमवार असे दोन दिवस खासदार शरद पवार मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देत आहेत. आज पहिल्या दिवशी तुळजापूर परिसरातील काक्रंबावाडी, लोहारातील सास्तुर, राजेगांव, उमरग्यातील कवठा, औसा तालुक्यातील उजनी, उस्मानाबादमधील पाटोदा, करजखेडा या गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेत शरद पवार यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

अतिवृष्टीमुळे जमीन खरवडून गेली आहे. त्यामुळे या नुकसानीचे स्वरूप हे नेहमीपेक्षा मोठे आहे. याशिवाय काही ठिकाणी कुणाच्या विहिरी होत्या, कुणाच्या पाईपलाइन होत्या, कुणी ठिबक सिंचन व्यवस्था केली होती. अन्य काही साधनं होती, तीदेखील वाहून गेली आहेत याची पाहणीही शरद पवार यांनी केली.

एखाद्यावेळी अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई येते तेव्हा पीक जातं ते त्यावर्षीपुरतं. पण या संकटामुळे जमिनीची जी अवस्था झाली आहे त्यामुळे पुढची काही वर्षे पीकच घेता येणार नाही. अतिवृष्टीचे हे संकट संपूर्ण शेतीव्यवस्था आणि अर्थव्यवस्था उद्धवस्त करणारं संकट आहे असे शरद पवार म्हणाले. या संदर्भात मुख्यमंत्री आणि देशातील प्रमुख लोकांशी बोलून तातडीची मदत कशी देता येईल असा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री गेंड्याच्या कातडीचे आहेत कारण यशोमती ठाकूरांनी जर… चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

News Desk

गुजरातच्या पटेलचा शिवसेनेला ‘हार्दिक’ पाठिंबा

News Desk

धीर सोडायचा नाही… सरकार तुमचं आहे ,शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला विश्वास

News Desk