HW News Marathi
महाराष्ट्र

९०० ई-बसेसमध्ये ३६०० कोटींचा घोटाळा; मिहीर कोटेजा यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप

मुंबई | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मला काही प्रश्न विचारायचेत की मुळात ९०० इ बसेस विद्युत गतीने खरेदी करण्याचा डाव हा मुंबईकरांसाठी आहे की कॅासेस मोबेलिटी या कंपनीच्या भल्यासाठी? केंद्र सरकारने राष्ट्रीय शुद्ध हवा वायू अभियानासाठी ३६०० कोटीचा निधी मुंबईकरांना शुद्ध हवा मिळावी. यासाठी दिला पण त्याच्यावर डल्ला विशिष्ट ठेकेदाराच्या भल्यासाठी मारला जातोय, असा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे. कोटेचांनी आज (१८ फेब्रुवारी) पत्रकार परिषदे घेऊन आरोप केले आहेत. 

निविदा २०० इ बसेसची गाड्यांची निघते ती नंतर ४०० केली जाते आणि मंजूरी मिळेपर्यंत कुठलीही पुर्ननिविदा न काढता ती ९०० होते. वास्तविकतेत आपण कधी जमीनीवर उतरून पाहणी केली आहे का? की ९०० दुमजली बसेस मुंबईच्या रस्त्यावर खरोखर त्या धावू शकतील का? याचा कधी फिजीबीलीटी रिपोर्ट घेतलाय का? असे अनेक सवाल कोटेचांनी आदित्य ठाकरेंना केले आहेत. 

किंबहूना ही खरेदी फक्त कागदावरतीच करायचा हेतू नाहीये ना? या कंपनीचं भाग भांडवल फक्त एक लाख रूपये आहे त्यांना तुम्ही २८०० कोटीचं कंत्राट कोणत्या आधारावर व कोणत्या हेतूसाठी देत आहात? याची आम्ही मुंबईकरांसमोर पोलखोल करणार तसेच २८०० कोटीच्या घोट्याळ्याबाबत आम्ही कॅग आणि न्यायलयात दाद मागणार. आम्ही मुंबईकरांचा मोकळा शुद्ध हवेत श्वास घेण्याचा हक्क तुमच्या घोट्याळ्या हिरावू देणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पॅकेजवर माझा विश्वास नाही जे गरजेचं आहे ते करणार,” उद्धव ठाकरेंचं कोकणवासीयांना आश्वासन

News Desk

अठरा शेतक-यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत 

News Desk

भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांची कारकीर्द

News Desk