HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना ‘जीवाणू’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मोर्चाची ताकद बघून धडकी भरली आहे | धनंजय मुंडे

मुंबई | शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या ‘सुकाणु’ समितीला ‘जीवाणू’ म्हणून हिणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची ताकद, निर्धार बघून आता धडकी भरली आहे. दिडशे किलोमीटरचं अंतर अनवाणी, रक्तबंबाळ पायानं तुडवत आलेल्या शेतकरी, आदिवासी बायाबापड्यांना हे सरकार आता फसवू शकणार नाही, आंदोलक शेतकरी प्रसंगी अन्नपाण्यावीना राहतील परंतु सरकारविरोधातला संघर्ष आता थांबणार नाही, असा निर्धार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज आझाद मैदान येथे शेतकरी मोर्चासमोर आणि विधान परिषदेत बोलताना व्यक्त केला.

धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आझाद मैदान येथे जावून मोर्चेकरी शेतकरी बांधवांची भेट घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चाला आणि त्यांच्या मागण्यांना संपूर्ण पाठींबा जाहीर केला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल तसंच विधीमंडळातही राष्ट्रवादी काँग्रेस हा मुद्दा आक्रमकपणे मांडेल, असा विश्वासही श्री. मुंडे यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिला.

संपूर्ण कर्जमाफी, कसणाऱ्याच्या नावावर जमीन, शेतीमालाला हमीभाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणीची मागणी मोर्चेकरी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागण्या अवास्तव नाहीत तर न्याय्य मागण्या असून त्या सरकारला मान्य कराव्याच लागतील, असा इशाराही श्री. मुंडे यांनी दिला. मोर्चाच्या आधल्या रात्री मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरुन मंत्र्यांनी केलेली धावपळ ही ‘नौटंकी’ असून शेतकरी आता असल्या नौटंकीला फसणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होऊन न्याय मिळेपर्यंत आता शेतकरी आणि आमच्यापैकी कुणीही स्वस्थ बसणार नाही, असेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

विधान परिषदेत कामकाज सुरु होताच धनंजय मुंडे यांनी हा विषय मांडून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे, आ. हेमंत टकले, आ. भाई जगताप, आ. जयंत पाटील, आ. कपिल पाटील, आ. जयवंत जाधव यांनीही भावना मांडल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नवाब मलिकांच्या अटकेनंतर नितेश राणेंचे ‘हे’ ट्वीट चर्चेत

Aprna

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात भाजप-शिवसेना पक्षांचे गोड कौतुक

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

Aprna
मुंबई

शेतकऱ्यांचा लाल सागर मुंबईत धडकला, सरकारची धावपळ सुरू

News Desk

मुंबई | नाशिक ते मुंबई असा सुमारे दोनशे किलोमीटरचा पायी प्रवास करून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हे शेतकरी विधानभवनाला घेराव घालणार आहेत. दरम्यान, मोर्चाची व्याप्ती पाहून सरकार खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी तत्काळ मंत्रिगटाची स्थापना करण्यात आले आहेत. दुपारी दोन वाजचा शेतकरी नेत्यांसोबत हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.

शेतकरी मोर्चामुळे संपूर्ण आझाद मैदन परिसरात लाल सागर पसरला आहे. गेल्या सहा दिवसांपासून उन वाऱ्याची पर्वा न करता, पिचलेला शेतकरी आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. दरम्यान, वन जमिन शेतकऱ्यांच्या नावे मिळावी, ही मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यावर सरकार काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लाठ्या काठ्या खावू वेळ पडल्यास गोळ्या झेलू परंतु मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याचे समजते.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच हा मुद्दा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित करून सरकार सहा दिवस झोपले होते, का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Related posts

मुंबईच्या नेपीएन्सी रोडवरील इमारतीला लागली आग, कोणतीही जीवितहानी नाही

News Desk

पुढच्या काळात फुटाफूट नको म्हणून राज ठाकरे सरसावले  

News Desk

मोनोरेलच्या आगीवर नियंत्रण

News Desk