HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का?”, अजित पवार म्हणतात..

नाशिक | उपमुख्यमंत्री अजित पवार आज (१ जुलै) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील दिवसभरातील कार्यक्रम आटोपून आणि जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रमोशन व्हावं असं वाटत नाही का? असा प्रश्न विचारला यावर क्षणाचाही विलंब न लावता ‘नाही वाटत’ असं उत्तर त्यांनी दिलं. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि पाच वर्षे तेच मुख्यमंत्री राहतील, असंही अजितदादांनी स्पष्ट केलं.

अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना परिस्थिती ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचवेळी त्यांना एका पत्रकाराने वेगळा प्रश्न विचारला. प्रत्येकाला बढती आणि प्रमोशनची अपेक्षा असते. तुम्हालाही उपमुख्यमंत्री राहून कंटाळा आला असेल. प्रमोशन व्हावं, मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? असा सवाल अजितदादांना करण्यात आला.

अनपेक्षितपणे आलेल्या या प्रश्नावर अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. मला प्रमोशन व्हावं असं नाही वाटत, असं त्यांनी थेट सांगितलं. तर हे सांगताना आपल्या विधानाचं समर्थन करणारं उदाहरणही दिलं. तुम्हीही पत्रकार आहात. तुम्हालाही आपण संपादक व्हावं वाटतं. पण सर्वचजण संपादक होत नाही. एकच व्यक्ती संपादक होत असतो. आमच्याकडेही 145 मध्ये एकच माणूस मुख्यमंत्री होतो. तो आम्ही बसवलेला आहे. तोही ५ वर्षासाठी बसवला आहे. त्यामुळे पाच वर्षे याचा विचारच करायचा नाही, असं अजितदादांनी सांगताच एकच हशा पिकला. असचं वक्तव्य या आधी देखील अजित पवारांनी केलं होतं.

५ वर्षे सरकार टिकणार आहेच

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेऊन उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद दिलं आहे. हे तीन नेते सांगतील तोपर्यंत सरकार चालणार आहे. शरद पवारांनी पाच वर्षे सरकार टिकणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनीही पाच वर्षे सरकार टिकावं अशी सोनिया गांधीची इच्छा असल्याचं स्पष्ट केलं आहे. परंतु, मधून मधून सरकारमध्ये अस्वस्थता असल्याच्या वावड्या उठवल्या जातात. बातम्या सोडल्या जातात. त्या बिनबुडाच्या असतात. त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सरकारने १ सप्टेंबरपासून मंदिरे उघडावीत आम्ही २ तारखेला मशिदी उघडू , इम्तियाज जलील यांचे सरकारला अल्टिमेटम

News Desk

महाराष्ट्र औद्योगिक धोरण-2013 नुसार स्थापित एसईझेड

News Desk

मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात ५०० पदांसाठी भरती

Aprna