HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, विरोधकांचा आक्रमक पवित्रा

मुंबई। महाविकासआघाडीची सरकारचे पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (२४ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले आहे. तर महिलांवर होणारे अत्याचार, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी अशा घोषणा देण्यात आल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२३ फेब्रुवारी) धिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे.

कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करु सांगितले, अनेक अटी टाकल्या, शेतकऱ्यांबाबत सरकारची फसवणुकीची मालिका कायम, आम्ही निषेध करतो, महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत, जनतेचा आक्रोश विधानसभेत पोहोचवू, असे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे विधीमंडळात दाखल, मुख्यमंत्री पोहोचण्यापूर्वी विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केल्या आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विरोधी पक्षाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यावरून सरकार काम करतेय हे विरोधकांना पचत नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी घेतली. स्वतः काही करायचे नाही, आणि आम्ही केलेल्या चांगल्या गोष्टींवर टीका करायची, अशी भूमिका विरोधी पक्षाची आहे. त्यामुळे विरोधकांच्या सर्वच प्रश्नांची उत्तर देण्याची गरज वाटत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्रेकिंग: छगन भुजबळ यांच्या लढ्याला मोठे यश

Sanjay Jog

आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश आणि आता थेट प्रवक्तेपदाची बक्षिसी

News Desk

२२७ कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी!– गुलाबराव पाटील

News Desk