HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करत नाही | प्रकाश आंबेडकर

मुंबई | जळगावातील जामनेरमध्ये मातंग समाजातील दोन मुले विहिरी पोहण्यासाठी गेले होते. म्हणून या मुलांना नग्न करुन मारहाण करण्यात आली आहे. आणि मारहाण केल्यानंतर त्यांची धिंड देखील काढण्यात आली. या प्रकरणाचा निषेध व्यक्त करत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार अत्याचार करणाऱ्यांवर कावाई न करता केवळ घडलेली घटना पाहत बसते, अशा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर केला आहे.

त्यामुळे तुम्ही अत्याचार करा, तुम्हाला काही होणार नाही, असा संदेश समाजात जात असल्याचे देखील आंबेडकरांनी म्हटले आहे. तसेच या घटनेनंतर पीडितांच्या कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. या प्रकरणावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणाची सुनावणी जलद न्यायालयात होणे, गरजेचे असल्याचे देखील आंबेडकरांनी सांगितले आहे. यानंतर जनतेत योग्य संदेश दिला जाईल, असे देखील आंबेडकर म्हटले आहे. या पीडित कुटुंब्यांची प्रकाश आंबेडकर भेट घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण, गुजरातचे सामाजिक कार्यकर्ते आणि दलित समाजाचे तरुन नेते जिग्नेश मेवाणी, रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आदी नेते मंडळीनी या प्रकरणाची दखल घऊन यांचा निषेध व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्रीडा, कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

News Desk

जर आपण कवडीमोलाची किंमत नसलेल्या नातवाचं ऐकलं असतं तर…अतुल भातखळकरांचे पवारांना प्रत्युत्तर

News Desk

मुंबईसह उपनगरांत सकाळपासून पावसाला सुरुवात, आज मुंबई, ठाण्यात ऑरेंज अलर्ट

News Desk