HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे !

मुंबई | महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे, अशी टीका केंद्रीय संरक्षणमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकार हे कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरले आहे, असेही ते म्हणाले. राजनाथसिंह यांनी काल (८ जून) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘महाराष्ट्र जनसंवाद रॅली’ संबोधित करणाता ते बोलत होते.

राजनाथ सिंह म्हणाले, “महाराष्ट्र सरकार हे कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरले आहे. कोविड-१९ चा फैलाव कसा रोखता येतो याची प्रेरणा उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील भाजप सरकारकडून घ्यावी,” असा सल्लाही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. राजनाथसिंह ऐवढ्यावरच थांबले नाही ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस चालू आहे. तसेच केंद्र सरकार कोविड-१९ शी लढण्यासाठी सर्व मदत करण्यास तयार आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकलेले स्थलांतरित मंजूर व कामगार त्यांना त्यांच्या मूळ गावी घेऊव जाण्यासाठी रेल्वे तयार होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने पुरेसे सहकार्य न केल्यामुळे स्थलांतरित मंजुरांची फरपट झाली, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात स्थलांतरित मंजुरांचे जे हाल झाले ते राज्य सरकारचे सहकार्य न केल्यामुळे झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ७,७१७ नवे कोरोनाबाधित, तर १०,३३३ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

भारतीयांच्या चिंतेत वाढ! गेल्या २४ तासांत देशातील कोरोना संख्या १ लाखांवर

Aprna

पडद्यावर खलनायक साकारणारा तू प्रत्यक्षात मात्र ‘हिरो’च !

News Desk