HW News Marathi
महाराष्ट्र

#Vidhansabha2019 : ३७० कलम हटवून न्याय, ३७० ध्वजांची सलामी

परळी | जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवून न्याय देण्याचा धाडसी निर्णय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला, शहांच्या या निर्णयाचे कौतुक करत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ३७० तोफांची सलामी आणि ३७० ध्वजांची सलामी दिली. दसरा मेळाव्यानिमित्ताने शहा बीडच्या सावरगाव घाट येथे आले होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, “अमित शहांच्या नेतृत्वात सीमोल्लंघन करायचे आहे. ही गर्दी भविष्याची दिशा बदलेल, मतांसोबत मनेही जिंकायचे आहे.”

दरम्यान, पंकजा मुंडे म्हणाल्या, ” गोपीनाथ मुंडे यांनी जे काम केले ते पुढे सुरू ठेवायचे आहे. माझ्या भावांना कोयता उचलण्याची वेळ येऊ नये, असे कार्य करायचे आहे. आज माझ्या संघर्षाने मला तुम्ही कौतुकाची थाप दिली. शेवटपर्यंत तुमचा स्वाभिमान अन् सन्मानासाठी काम करायचे आहे,” असे त्या म्हटल्या.

तसेच तुमच्या मनात गोपीनाथ मुंडे आहे, तुमच्या दारात सेवा यावी यासाठी कार्य करायचे आहे. तुमची सेवा करण्याचे काम मला नेतृत्वाने दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानते. ४ वर्षापूर्वी अहंकराचा गड उतरून नवी सुरुवात केली. तुमच्या उपस्थितीतने मला शाबासकी मिळाली आहे, नेतृत्वाची शाबासकी मिळणे हे मोठे भाग्य आहे. ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडेंनी काम केले. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानबाबांच्या विचाराने काम केले असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांनी ‘या’ निमित्ताने आपल्या पक्षात आत्मचिंतन घडवावे !

News Desk

काँग्रेस आता अ‍ॅक्शन मोडमध्ये, २ दिवसांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली!

News Desk

शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब – गोपीचंद पडळकर

News Desk