HW News Marathi
महाराष्ट्र

आता महाशिवआघाडी नव्हे तर महाविकासआघाडी ?

मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. यामुळे आता वेगळे समीवकरण पाहायला मिळणार आहे. या तिन्ही पक्षांच्या एकत्र समीकरणाला महाशिवआघाडी म्हणून नावरुपाला आले होते. या महाशिवआघाडीतमध्ये शिवसेनेचे नावाचा उल्लेख दिसून येत आहे.

यात समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमान शेतकरी संघटनेसह मित्रपश्रांनी मिळून महाआघाडी बनली आहे. त्यामुळे महाशिवआघाडी नाही तर महाविकासआघाडी नावांने या नव्या समीकरण नावा रुपाला यावे, असा प्रस्ताव काल (२१ नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पारित करण्यात आला आहे.

आता महाविकासआघाडीच्या सरकार स्थापनेच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. या बैठकीत किमान समान कार्यक्रमात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादींच्या नेत्यांनी सांगितले आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्षांसाठी असेल तर या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री देण्यात येणार आहे. यात राष्ट्रवादी अडीच वर्षां तर काँग्रेस अडीच वर्षा उपमुख्यमंत्री पद भूषविणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दूध दरवाढीच्या मागणीसाठी सदाभाऊ खोत आक्रमक, ‘चाबूक फोड’ आंदोलनाची घोषणा

News Desk

१२ कोटी लस उपलब्ध झाले तर एकरकमी विकत घ्यायची राज्य सरकारची तयारी !

News Desk

खासगी कंपनीच्या माध्यमातून सदाभाऊ इस्त्राईलच्या दौऱ्यावर

News Desk