HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारने केले ६ हजार २०० लोकांचे पुनर्वसन

पुणे | गेल्या काही दिवसांत सलग झालेल्या वादळी पावसामुळे राज्यातील १६ गावांना पुराचा फटका बसला. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि पुण्याला अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत प्रशासनाने ६ हजार २०० नागिकांचे पुनर्वसन केले असून सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात १३ हजार ६३६ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरी करण्यात आले आहे. पुण्यातील ५८ तालुक्यातील ३० तालुक्यात अतिवृष्टी झाली असून पुण्यात आतापर्यंत १३७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

तसेच साताऱ्यातील १९ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी आदि सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) २२ पथके कार्यरत आहेत. मुख्य सचिवांनी केंद्रीय सुरक्षा सचिवांशी संपर्क साधून डोनिअर विमानाच्या माध्यमातून पुरग्रस्तभागातील नागरिकांना स्थलांतर करण्याची मागणी केली. त्यानुसार आता कार्यवाही सुरू असल्याचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोल्हापूरमधील २०४ गावांना पुराचा फटका बसला आहे. प्रशासनामार्फत सध्या ११ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. आता नौदलाचे बचाव पथक देखील कार्यरत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडी सरकार हे एकटी शिवसेना चालवत नाही, राष्ट्रवादीची सेनेला आठवण

News Desk

मोदींविरोधी मोर्चेबांधणी, राज ठाकरे घेणार ममता बॅनर्जींची भेट

News Desk

अंजली दमनीयांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

News Desk