HW News Marathi
Covid-19

राज्य सरकारने जून-जुलैतील कोरोनबाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन तयारी करावी !

मुंबई | कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल (२० मे) सायंकाळी राजभवनावर आयोजित बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. येत्या जून व जुलैतील कोरोनबाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन संपूर्ण राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची सूचना केली. तसेच बिगर कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, आरोग्य सेवक, रुगणालयांतील उपलब्ध खाटा यांची एकत्रित माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करा, आघाडीवर राहून कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस यांना प्रोत्साहन देण्याबाबत शासनाने विचार करावा, अशा सूचनाही राज्यपालांनी बैठकीत केल्या.

कोश्यारींनी धारावीसारख्या कंटेन्ट झोनसाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देशही राज्याला दिले आहे. कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी राज्याच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी कोश्यारींनी काल बोलविलेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने आधी राजभवनला कळविले होते. बैठकीत राज्यपालांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या आधी मला फोन केला होता आणि ते येऊ शकणार नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या वतीने मुख्य सचिव अजोय मेहता बैठकीला उपस्थित होते.

कोश्यारींनी राज्य प्रशासनाला असेही आवाहन केले की, कोविड नसलेल्या रूग्णांना वैद्यकीय सुविधा मिळाल्यामुळे त्रास होऊ नये, यासाठी पावले उचलावीत, अशी सूचना सरकार दिल्या आहेत. पालिकेचे आयुक्त आय.एस. चहल यांनी मुंबईच्या परिस्थितीविषयी सादरीकरण केले, तर आरोग्यसचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यपालांना राज्याच्या सज्जतेबद्दल माहिती दिली. तसेच कोश्यारी यांनी परप्रांतीय कामगारांना आपापल्या गावी पाठविण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला आणि महाराष्ट्रात स्थलांतरित कामगारांसाठी मदत शिबिर सुरू केली.

या बैठकीत यावेळी मुंबई मनपा आयुक्त आय एस चहल तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीताराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

भाजपच्या शिष्टमंडळाने घेतील राज्यपालांची भेट

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (१९ मे) त्यांची भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी ही बैठक बोलावली होती. फडणवीस यांनी राज्यपालांच्या भेटी दरम्यान, “राज्यातील आरोग्य यंत्रणा कोसळल्याचा आरोप केला होता. कोरोना रुग्णांना रुग्णालयात बेडची सोय नाही. राज्याने संकटाला तोंड देण्यासाठी योग्य पावले उचलली नाहीत असे दिसते. म्हणूनच, देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे आहेत आणि अजूनही ही संख्या वाढत आहे, ”असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. माजी मुख्यमंत्र्यांनीही राज्यासाठी आर्थिक पॅकेजची मागणी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील दररोजच्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात तुलनेने घट…

News Desk

कोरोना रुग्णाच्या ‘होम आयसोलेशन’करिता केंद्राच्या नव्या महत्त्वपूर्ण सूचना

News Desk

…तर कोव्हॅक्सिन लस टोचून घेऊ नका, भारत बायोटेकने दिला गंभीर इशारा

News Desk