HW News Marathi
महाराष्ट्र

जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नाशिक | अहमदनगर-नाशिकच्या धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत आज (३१ ऑक्टोबर)ला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जायकवाडीला पाणी सोडण्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

नाशिकमधील गंगापूर आणि दारणा, तसेच अहमदनगरच्या भंडारदरा आणि निळवंडे या धरणांतून एकाच वेळी पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे मराठवाड्याला पाण्यासाठी गेली दोन दिवस वाट बघत आहे.

धरणात ऐवढे पाणी सोडले जाणार

जायकवाडी धरणामध्ये मुळामधून ५४ दलघमी १.९० टीएमसी, प्रवरामधून १०९ दलघमी ३.८५ टीएमसी, गंगापूर धरणातून १७ दलघमी ०.६० टीएमसी, दारणा धरणातून ५७.५० दलघमी २.०४ टीएमसी, पालखेड समुहातून १७० दलघमी ६० टीएमसी असं एकूण २५४ दलघमी (८.९९ टीएमसी) अशा विविध धरणांमून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात येणार आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी राम कदम पुढे आले

News Desk

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा तर फडणवीसही जाणार पश्चिम महाराष्ट्रात!

News Desk