HW News Marathi
महाराष्ट्र

‘हे’ सरकार पाडण्यासाठी बाहेरुन कोणतेही प्रयत्न करण्याची गरजच नाही !

मुंबई | “राज्यातील हे सरकार पाडण्यासाठी बाहेरुन कोणीही कोणतेही प्रयत्न करण्याची गरजच नाही”, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकासाआघाडीला सरकारला लगावला आहे. भाजपकडून राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे सरकार पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. याच पार्श्वभूमीवर बोलताना आता चंद्रकांत पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण देत महाविकासाआघाडीला हा टोला लगावला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

“आम्ही विरोधाला विरोध करणारे नाही. राज्यातील समस्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होणे महत्त्वाचे असल्याने आम्ही विस्तार करण्याची मागणी करत होते. आमचा पक्ष एक चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करू. या सरकारला पाडण्याचा किंवा या सरकारला खाली खेचण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही. राज्यातील हे सरकार पाडण्यासाठी बाहेरुन कोणीही कोणतेही प्रयत्न करण्याची गरजच नाही”, असे चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

“इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे राजकारण प्रामाणिकपणे व्हायचे. मात्र, आता त्याचे काय झाले आहे ते कळत नाही. जसे अवकाळी पाऊस, गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्त्या अनाकलनीय आहेत. त्याचप्रमाणे, आता सध्या महाराष्ट्राचे राजकारणही अनाकलनीय झाले आहे”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझे आणि शिवसेनेतील संबंधांवर संजय राऊत म्हणाले….! 

News Desk

शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर होणार मुंबईच्या नव्या महापौर

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलचा शेवटचा पेपर रद्द

News Desk