HW News Marathi
देश / विदेश

पालघर मॉब लिंचिंगमागे कोणतेही धार्मिक कारण नाही, धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करू नका !

मुंबई | “पालघर मॉबलिंचिंगमागे कोणतेही धार्मिक कारण नाही. पालघर घटनेला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न नको, हे प्रकरण दोन धर्मांमधील संर्घष बिलकुल नाही,” असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पालघर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी आज (२० एप्रिल) फेसबुक लाईव्हीद्वारे संवाद साधला आहे. पालघरमध्ये झालेला मॉबलिंचिंकचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, यावर सरकारव दोषारोप करणे अयोग्य, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“गेल्या पाच वर्षांपासून देशात ठिकठिकाणी मॉब लिंचिंग झाले. त्यात आता आपल्याला जायचे नाही. पालघरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल सरकार काय करतेय हे मला सांगायचे,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपला टोला लगावला आहे. या प्रकरणासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्याशी देखील फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सोशल मीडियातून आगी लावणाऱ्यांनाही चाप लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांशीह देखील मी याबाबत बोललो आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालघर प्रकरणावर मुख्यमंत्री म्हणाले की, “या प्रकरणातील ५ मुख्य आरोपींना अटकर करण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत. या प्रकरणी जवळपास ११०जणांना अटक केला आहे. हा संपूर्ण प्रकरण पोलिसांसमोर झालेत हे खरे आहेत, ही गोष्टी देखील मुख्यमंत्र्यांनी नमुद केली आहे. पालघर प्रकरण सीआयडी क्राईमकडे सोपविल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या प्रकरणी दोन पोलिसांना इन्स्पेक्टर सस्पेंड आहे”

मुख्यमंत्री म्हणाले, “हे साधू गुजरातमध्ये चालले होते. त्यांना तिथे प्रवेश दिला गेला नाही. त्यांना ताब्यात घेतले गेले असते आणि महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून दुसऱ्या दिवशी त्यांच्याबाबतीत निर्णय घेतला गेला असता तर ही घटना घडली नसती गडचिंचली हे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे. तिथे गैरसमजुतीने साधूंवर हल्ला केला गेला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. केंद्रशासित प्रदेशात त्यांना प्रवेश नाकारला गेला. तिथून त्यांना परत पाठवले गेले. त्यानंतर ही घटना घडली. साधूंची हत्या झालीय. तुम्ही गप्प का? असे अनेक प्रश्न विचारू लागेल, पण आम्ही गप्प बसलेलो नाही, पालघरच्या घटनेतील कुणालाही सोडलेले नाही, “असे त्यांनी यावेळी सांगतिले.

 

मुख्यमंत्र्यांच्या संबोधिनातील महत्त्वाचे मुद्दे

 

  • सोशल मीडियातून आगी लावणाऱ्यांनाही चाप लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांशीह देखील मी याबाबत बोललो आहे
  • पालघरमध्ये जे झालं ते दुर्दैवी. पण आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न कुणी करू नका. हा कुठल्याही धर्माचा मामला नाही
  • पालघरच्या घटनेतील कुणालाही सोडलेलं नाही. सोडणार नाही
  • साधूंची हत्या झालीय. तुम्ही गप्प का? आम्ही गप्प बसलेलो नाही
  • केंद्रशासित प्रदेशात त्यांना प्रवेश नाकारला गेला. तिथून त्यांना परत पाठवलं गेलं. त्यानंतर ही घटना घडली
  • गडचिंचली हे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे. तिथं गैरसमजुतीनं साधूंवर हल्ला केला गेला. त्यात त्यांचा मृत्यू झाला
  • गेल्या पाच वर्षांपासून देशात ठिकठिकाणी मॉब लिंचिंग झालंय. त्यात आता आपल्याला जायचं नाही. पालघरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल सरकार काय करतेय हे मला सांगायचेय
  • राज्य सरकारवर जनतेला विश्वास दाखवला आहे,
  • गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यानाथ यांच्याशी देखील फोनवरून बोलणे झाले आहे. या
  • मॉब लिंचिंगमागे कोणतेही धार्मक कारण नाही, पालघर घटनेला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न नको
  • हे प्रकरण म्हणजे दोन धर्मांमधील संर्घष बिलकुल नाही
  • या प्रकरणी जवळपास ११०जणांना अटक केला आहे तर हे प्रकरण पोलिसांसमोर झालेत हे खरे आहेत.
  • पालघर प्रकरण सीआयडी क्राईमकडे राज्य सरकारने सोपविली आहे
  • हा प्रकरण कळाल्यानंतर पोलिसांनी ५ प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे
  • पालघरमध्ये झालेला मॉबलिंचिंकचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, यावर सरकारव दोषारोप करणे अयोग्य
  • संकट टळले, या भ्रमात राहू नका
  • लॉकडाऊन नसल्यासारखी गर्दी करणे गंभीर आहे, लॉकडाऊन अद्याप उघडले नाही, नियम न पाळल्यामुळे कडक निर्बंध लावावे लागतील
  • गेल्या २४ तासात
  • दिलेली शिथिलता ही केवळ ही टेस्ट आहे
  • कोरोनाविरुद्ध लढाईही आपली प्राथमिकता आहे
  • डॉक्टर, नर्सेस, पोलिस खूप मेहनत करत आहेत
  • महाराष्ट्रात कोरोना रुग्ण सापडणून ६ आठवडा पूर्ण झाले आहेत
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अँगेला मार्कल चौथ्यांदा चॅन्सलर

News Desk

लष्कराच्या कारवाईत काश्मिरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक

News Desk

मोफत अन्नधान्य पुरविल्यामुळे लोक आळशी होतात | मद्रास उच्च न्यायालय

News Desk