HW News Marathi
महाराष्ट्र

Prithviraj Chavan Exclusive | काश्मीरची नाही, ही निवडणूक महाराष्ट्राची आहे !

कराड | “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील लोकांच्या रोजीरोटी आणि पोटापाण्याच्या प्रश्नावर चर्चा करत नाही, तर ते कलम ३७० वर चर्चा करतात. काश्मीरचे मुद्दे, ही काश्मीरची निवडणुकी नाही, ही निवडणूक महाराष्ट्राची आहे,” असे म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एच. डब्ल्यू मराठीशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रतील बेरोजगारी, उद्यागोची परिस्थिती, शेतकऱ्यांच्या विक्रमी आत्महत्या,हामीभावाबद्दल बोल नाही, शेतकऱ्यांची फसवणूक, स्वामीनाथन आयोग लागू करून असे, लोकांच्या लक्ष्यात आले की, भाजप सरकारकडे जनतेच्या पोटापाण्याची उत्तरे नाही, असे यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना सांगितले.

दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये झाले महाराष्ट्रातील होईल, या राज्यातील जनतेला कळाले की, राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचे समर्थ आहे, महाराष्ट्रतील जनता देखील मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढप्रमाणे निर्णय घेईल. मुख्यमंत्री असताना मी काय कामे केली आहे ते जनते समोर आहे, तसेच मी कराडसाठी काय केले? हे देखील जनतेसमोर आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी एच. डब्लू. मराठीशी बोलताना अमित शहांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले.

बेडकाला फुगविला तर गाय आणि हत्त होत नाही

केंद्रीय विश्वविद्यालया तयार केली, अठराशे कोटीची कामे झालीत याची फलक मी लावली आहेत. त्यामुळे बेडकाला हवा मारुण फुगविले तर गाय होत नाही किंवा हत्ती होत नाही, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्यावर एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना टीका केली आहे.

एकही पायाभूत प्रकल्प भाजप सरकारला पूर्ण झाला नाही

फडणवीस सरकारच्या काळात एकही पायाभूत सविधा असल्याचा प्रकल्प पूर्ण करता आला नाही. मेट्रो मी सुरू केली होती. मेट्रो ३चे भूमी पूजन मी केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काही झाले नाही. नवी मुंबईतील विमानतळ, छत्रपती शिवाजी स्मारक,  सृद्धती महामार्गाचा मोठा जागावाजा केला, परंतु काही करत आले नाही.  गेल्या ५ वर्षाता या सरकारला काही करत आले नाही,  त्यामुळे राज्यात बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सगळ्याबाबाती सरकार अपयश ठरतय, म्हणूनच महाराष्ट्रच्या शेतकऱ्यांच्या, बेरोजगारी युवकांच्या, युवतीच्या शेतीच्या रोजगारांच्या बेरोजगारीकडे लक्ष न देता कलम ३७०चा घोषणा देता ही निवडणूक काश्मीरची नाही ही निवडणूक महाराष्ट्राची आहे. कृपाकरून महाराष्ट्राच्या रोजीरोटीच्या प्रश्नावर या त्यावर चर्चा करा, असे म्हणत शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी एच. डब्ल्यु.मराठीला दिलेल्या मुलाखती राज्य सरकारवर टीका केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 डिएसकेंची मालमत्ता होणार जप्त, सरकारचा आदेश

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिला विशेष संदेश!

News Desk

महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येईल; मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं विधान

News Desk