HW News Marathi
Covid-19

लाखो रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकारने दिला दिलासा

नवी दिल्ली | रेशन कार्डधारकांना केंद्र सरकारने एका नियमात बदल केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा लाखो रेशनकार्ड लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. रेशन कार्डाला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सप्टेंबरपर्यंत रेशन कार्डला आधार क्रमांकला जोण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. काल (११ मे) सरकारने यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. आणि जर आधार क्रमांक जोडला नसेल तरी रेशन कार्डधारकाला धान्य मिळत राहणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

आता आधार क्रमांक रेशन कार्डला जोडण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. रेशन कार्डशी आधार क्रमांक न जोडल्यास ते रद्द करण्यात येईल अशा चर्चा सुरू होत्या. अशा परिस्थितीत सरकारकडून ही मुदतवाढ देण्यात आली आहे.अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या अधिसूचनेच्या आधारे सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना रेशनकार्ड आधार क्रमांकाशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. कोनाच्या या संकटाशई सामना करण्यासाठी देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यातच गरीब कुटुंबांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून सरकारने तीन महिन्यांपर्यंत एकूण १५ किलो धान्य मोफत देण्याचाही निर्णय घेतला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आले !

News Desk

ठाकरे सरकारची नवी नियमावली जारी, ‘या’ वेळेतच किराणा, भाजीपाला घेता येणार!

News Desk

लोकल सेवेबाबत आठवडाभरात निर्णय घ्या! अन्यथा आंदोलनाचा भाजपचा इशारा

News Desk