HW News Marathi
महाराष्ट्र

जनतेची दिशाभूल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा ? | अशोक चव्हाण

नांदेड | भाजप सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समजाला आरक्षण देऊ, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु फडणवीस यांना सत्तेत येऊन ४ वर्षा झाले असून देखील हे प्रश्न सुटले नाही.तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून एक वर्ष उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, अशा अनेक मुद्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तोडसूक घेतले.

न्यायालयाने मुस्लीम समाजाला आरक्षण दिले असून सुद्धा मुख्यमंत्री याबाबत काहीच बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत मेगाभरतीवर स्थगित करण्यात आली आहे. मेगा भरतीवर स्थगिती आल्यानंतर सर्वच समाजातील तरुणांचे नुकसान होणार आहे. काँग्रेसच्या काळात मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते. परंतु काँग्रेसने कधीही आरक्षणाच्या मुद्याचे राजकारण केले नाही. मात्र भाजप सरकारने आरक्षणावरून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“किती काळ विरोधी पक्षात बसणार?”, फडणवीसांनी हसत दिले उत्तर

News Desk

‘केंद्रातील जुलमी, अत्याचारी भाजपा सरकारविरोधात पेटून उठा’, नाना पटोलेंचं आवाहन!

News Desk

सगळे खापर केंद्र सरकारवर फोडायचे आणि स्वतः मात्र काही करायचे नाही!, भारती पवारांचे महाविकासआघाडीवर टीकास्त्र

Aprna
महाराष्ट्र

आंदोलकांवर अॅट्रॉसिटी दाखल करा | डॉ. हिना गावित

swarit

नवी दिल्ली | सकल मराठा समाजाचे रविवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन सुरू होते. या आंदोलना दरम्यान भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या गाडीवर चढून घोषणाबाजी करत तोडफोड केली. ज्या आंदोलकांनी मराठी गाडीवर चढून तोडफोड केली, त्या सर्वांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप खासदार हिना गावित यांनी लोकसभेत केली. मी आदिवासी महिला खासदार असल्याने जाणीवपूर्वीक लक्ष केले, असा आरोप हिना गावित यांनी लोकसभेत केला.

या घटनेनंतर पोलिसांनी १५ ते २० आंदोलकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला, परंतु त्यांना दोन तासाच्या आत सोडून दिले. ज्या व्यक्तीने हा हल्ला केला, त्याचा हार तुरे घालून सत्कार करण्यात आला, असा सवाल हिना गावित यांनी उपस्थित केला.

 

नेमके काय घडले

खासदार डॉ. हिना गावित या एका बैठकीसाठी धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या होत्या. बैठक संपल्यानंतर परत जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या. तेव्हा अचानक मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी त्यांच्या हिना यांच्या गाडीवर हल्ला केला. हिना त्यावेळी कारमध्ये असताना आंदोलक कारवर चढले होते. पोलिसांनी हिना यांना बाहेर काढल्यानंतर काही आंदोलकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याच प्रयत्न केल्याचे गावित लोकसभेत सांगत होत्या.

नंदुरबार बंद

मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी गावित यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये बंद पाळण्यात आला. याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.

Related posts

ई – गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून देणार! – मुख्यमंत्री

Aprna

डॉ. बाबासाहेबांनी दिलेले विचार आणि संविधानातच देशवासियांना पुढे घेऊन जाण्याची ताकद – अजित पवार

News Desk

अनेकांना वाटत होते, मी निवृत्त होईल पण तसे घडले नाही !

swarit