HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात आणखी दोन दिवस थंडीची लाट कायम

मुंबई | उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे शुक्रवारी (८ फेब्रुवारी) आणि शनिवारी (९ फेब्रुवारी) राज्यात थंडीचे प्रमाण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे आहे. आता अहमदनगरमध्ये ९.९ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ११ फेब्रुवारी रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहील. शुक्रवार आणि शनिवारी मुंबईचे कमाल व किमान तापमान २८ ते १७ अंशाच्या जवळपास राहील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा विशेषत: उत्तर कोकणावर परिणामामुळे मुंबईसह उत्तर कोकणाच्या तापमानात घट होईल, असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेसाठी काँग्रेसकडून प्रस्ताव नाही, वंचित बहुजन आघाडीने पत्रकातून दिले स्पष्टीकरण

Aprna

शिवसेना आमदारांची बैठक संपली, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार

News Desk

कोरोनाचा प्रादुर्भाव घटला, पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घ्या, आंबेडकरांची मागणी!

News Desk