HW News Marathi
महाराष्ट्र

योग्यवेळ येताच मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सपाटून बोलणार – उदयनराजे भोसले

सिंधुदुर्ग | मराठा आरक्षणाचा मुद्दा गेले अनेक दिवस आक्रमक होता. मात्र, आता हा मुद्दा तितका चर्चेत नाही आहे. दरम्यान, भाजप खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार काय करत आहे हे मी पाहत आहे. सरकारच्या भूमिकेवर योग्यवेळी मी सपाटून बोलणार आहे, असा सूचक इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

गोव्याचा दोन दिवसाचा दौरा आटोपून साताऱ्यात जात असताना उदयनराजे भोसले आज बांद्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष राजाराम सावंत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बांदा मराठा समाज मंडळाच्यावतीने त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यता आलं. माजी सरपंच सावळाराम सावंत यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर राजाराम सावंत आणि उदयनराजे यांच्यात अर्धातास चर्चा झाली.

यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हा इशारा दिला आहे. मी फक्त योग्यवेळेची वाट पाहत आहे. योग्यवेळ येताच मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सपाटून बोलणार आहे, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजे पुन्हा आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, बांदा मराठा समाज मंडळाचे कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, मराठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असे वक्तव्य उदयनराजे यांनी नुकतेच केले होते. तसेच आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला होता. वेळ आल्यावर मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन. मात्र, राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले होते. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या दिशेने होता.

सर्वोच्च न्यायालयात ९ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळायला पाहिजे, या भूमिकेवर आपण अजूनही ठाम असल्याचे सांगतानाच योग्यवेळी मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन, असेही त्यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यावरण आणि पर्यटन खाते मिळाल्यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले…

News Desk

कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे सरकार येणार आणि ५ वर्ष चालणार!

News Desk

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आज गोव्याच्या राज्यपाल पदाची घेतली शपथ

News Desk