HW News Marathi
देश / विदेश

“आपण पुन्हा लग्न करुयात आणि सत्तांतर करुयात..”, मोदी-ठाकरे भेटीवर उदयनराजेंची प्रतिक्रिया

सातारा | मुख्यमत्री उद्दव ठाकरे यांनी आज (८ जून) पंतप्रधान नरेंद्र नोदी यांची दिल्लीत भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रमाुख्याने ही भेट होती. मात्र, यावेळी अनेक विषयांवर मोदी आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाली. दरम्यान, या आधिकृत चर्चेआधी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात काही वेळ व्यक्तीगत भेट झाल्याची माहिती येत आहे. अर्थान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भेटीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, आता यांच्या या भेटीवर राजकीय वर्तृळात चर्चा सुरु झाली आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही मोदी आणि ठाकरे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात सत्तांतर होणार असं सूचक वक्तव्य उदयनराजे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.

उदयनराजे म्हणाले की, “थेट दिल्लीत मोदींना पंतप्रधान म्हणून भेटायला जाण्याची आधी तुम्ही म्हणजेच राज्य सरकारने अधिवेशन घेऊन चर्चा करयाला हवी होती. नंतर त्यांना कधीही जाऊन भेटा तुम्ही. हे भेटून राजकीय तडजोड करणार आणि एकत्र येऊयात असं बोलणार आणि परत सत्तांतर होणार. या भेटीत काहीतरी घेवाण-देवाणचं होणार असं वाटतं. महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडत आहेत अशात मग आपण पुन्हा एकत्र येऊयात पुन्हा लग्न लावूयात आणि समाजाला शांत करुयात. आता फक्त मुस्लिम समाजाला पुरा आणि हिंदु समाजाला जाळा इतकंच बाकी राहीलं आहे”, असं म्हणत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे.

मोदी-ठाकरे भेटीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

यावेळी फडणवीस असं म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज दिल्लीत व्यक्तिगत भेट झाली असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याचं स्वागतच आहे. या भेटीमुळे राज्याला फायदाच होईल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मोदी-ठाकरे भेटीचं स्वागत केलं. मोदी आणि ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली की नाही मला माहीत नाही. झाली असेल तर चांगलेच आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. अशा भेटीमुळे राज्याला फायदाच होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोणतंही शिष्टमंडळ जेव्हा पंतप्रधानांना भेटायलं जातं. तेव्हा शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एकांतात चर्चा होत असते, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, राजकराणात आम्ही एकमेकांना विरोध करतो पण वैयक्तिक आयुष्यावर त्याचा परिणाम होत नाही, असं फडणवीसही म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत

swarit

भाजप आमदारांची राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला मारहाणीनंतर माफीनामा

News Desk

दहशतवाद्याचे चिथावणीखोर भाषणाचे 25 तास प्रसारण

News Desk