HW News Marathi
महाराष्ट्र

२१ ऑगस्टपासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

मुंबई । राज्यात मुसळधार पावसामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत निर्माण झालेली भीषण पूरस्थिती आता हळूहळू आटोक्यात येण्यास सुरूवात झाली आहे. या भागांतील पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यातील भीषण पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्भव ठाकरे येत्या २१ आणि २२ ऑगस्टला या पूरग्रस्त भागाचा दौरा करतील. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित असतील. त्याचप्रमाणे, यावेळी कोल्हापूरमधील अन्य महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार देखील उपस्थित असतील. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यात भीषण पूरस्थिती असताना शिवसेना नेते एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक, धैर्यशील माने आपल्या कार्यकर्त्यांसह या पूरग्रस्त भागात काम करत होते. दरम्यान, त्यापूर्वी शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. राज्य पूरस्थितीचा सामना करत असताना मातोश्रीवर मात्र विधानसभेच्या दृष्टीने पक्षप्रवेशांचे सत्र सुरूच होते. त्यामुळे, सर्व स्तरातून शिवसेनेवर टीका झाली. त्यानंतर आता काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण आदित्य ठाकरेंसोबत पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनगणना केल्यावरच ओबीसींना न्याय मिळेल, विजय वडेट्टीवारांनी केल्या ‘या’ तीन मागण्या

News Desk

कर्जत पंचायत निवडणुकीवरून पवार आणि शिंदे पुन्हा आमने-सामने!

News Desk

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची आज जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेत बैठक 

News Desk