HW News Marathi
महाराष्ट्र

थकबाकीची रक्कम भरल्यास शेतकऱ्यांना ५० टक्के वीजबिल माफी मिळणार 

मुंबई | वीजबिल माफीच्या संदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली.कृषी पंपाच्या वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरली तर शेतकर्‍यांना ५० टक्के वीजबिल माफी मिळणार, असा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. त्यानंतर हे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.

ऊर्जा विभागातील शेती विषयक धोरणं मांडण्यात आली. आज शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शनबाबत निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात शेती पंपाची बिकट अवस्था आहे. आता ६६ टक्के निधी त्यासाठी वापरण्यात येईल. ४० हजार कोटींची थकबाकी होती, त्याबाबत निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांची मागील 5 वर्षांची थकबाकी होती, त्याचे डीले चार्जेस माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.

महत्त्वाचे निर्णय-

– २०१८ नंतर कृषी पंपांना वीज कनेक्शन देता येत नव्हते

– आता नवे धोरण आणले आहे, त्यानुसार कृषी पंपांना वीज कनेक्शन देता येईल

– शेतकर्‍यांकडे ४० हजार कोटींची थकबाकी आहे

– त्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे

– मागील पाच वर्षांतील डिले चार्जेस रद्द केले जाणार आहेत

– थकबाकीची रक्कम शेतकर्‍यांनी भरली तर ५० टक्के वीजबिल माफी मिळणार आहे

– दरवर्षी लाख भर शेतकरी कृषी पंप कनेक्शनसाठी अर्ज करतात

– २ लाखांच्या वर कृषी कनेक्शन द्यायचे आहेत ते दिले जातील

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कडकनाथ घोटाळा प्रकरण | राजू शेट्टी स्वतःच ईडीच्या कार्यालयात दाखल

News Desk

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, याबाबत विधिमंडळात सोमवारी विधेयक मांडणार! – अजित पवार यांची घोषणा

Aprna

मराठी पाट्यांचं श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचंच! – राज ठाकरे

News Desk