HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरेंचा उद्धव ठाकरेंनी छळ केला, नारायण राणेंचा गंभीर आरोप

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण म्हणजे निर्बुद्ध बरळणं होतं अशी खोचक टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ४७ शिवसैनिकांच्या भव्य मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. त्यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना काय बोलावं कसं बोलावं हे अजून कळत नाही. मुख्यमंत्री पदासाठी हा माणूस लायकच नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांनी छळ केला, असा गंभीर आरोप नारायण राणेंनी यावेळी केला आहे. आणि जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुम्हाला कधी मुख्यमंत्री केलं नसतं असेही ते म्हणाले.

“महाराष्ट्राशी बेईमानी करुन हा माणूस मुख्यमंत्री झाला. ५६ जागा मिळाल्या तरीही मुख्यमंत्री झालात कारण सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली. मोदींचं नाव घेऊन निवडणूक जिंकली आणि सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली. सुशांतप्रकरणी स्वतःच्या मुलाला क्लिन चीट दिली. मात्र सुशांतने आत्महत्या केलेली नाही. सुशांतचा खूनच झाला आहे याप्रकरणी एक दिवस आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार आहे”.

“मला आणि माझ्या मुलांना बेडुक म्हणतो हा माणूस? हा माणूस पुळचट आहे अशीही टीका नारायण राणे यांनी केली आहे. तर २५ वर्षांत शिवसेना संपेल असेही राणे म्हणाले आहेत. तर, सुशांतची आत्महत्या नाही, खून आहे, किती लपाल, किती वाचायचा प्रयत्न कराल, पोलिसांचा वापर करुन मुलाला वाचवलं, सत्तेचा दुरुपयोग केला, दिशाचे हत्या प्रकरणही बाहेर येईल, बलात्कार कोणी केला ते समजेल”, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कृतीची गरज

swarit

फडणवीस सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांना स्थगिती देणे हे ठाकरे सरकारचं वैशिष्ट्य 

News Desk

आता थेट केंद्रीय आरोग्यमंत्रीच म्हणाल्या, ‘उद्धवजी, मंदिरं उघडा!’

News Desk