HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार येता कामा नये

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी खरीप हंगाम कामांचा आढावा आणि बी बियाणे, खते, किटकनाशके, पिक कर्ज वाटप, कापूस, तुर व धान खरेदीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. आगामी खरीप हंगामामध्ये बी बियाणांचा तुटवडा पडू देऊ नका. बोगस बियाणांच्या प्रकारात कडक शिक्षा होईल हे पहा आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा.

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. यातून त्यांनी अधिकाऱ्यांना दरडावत शेतकऱ्यांबाबत कोणतीही हयगय चालणार नाही, असाच संदेश दिला आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही अशी तक्रार येणार नाही यासाठी काळजी घेण्याच्या स्पष्ट सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच बोगस बियाणांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश त्यांनी दिले.

याबैठकीत माहिती देण्यात आली की, खरीप हंगामासाठी 43.50 लाख मेट्रिक टन इतकी मागणी केंद्राकडे नोंदवली होती. त्यापैकी 40 लाख मेट्रिक टन पुरवठ्यास मंजुरी आली आहे. याशिवाय 50 हजार मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार!’

News Desk

शिवनेरी गडावर भाजप विरोधात घोषणाबाजी

News Desk

संचारबंदीची ऐशीतैशी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या संपर्क कार्यालयावर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

News Desk