HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीठीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मुंबई | कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतंच आहे. सद्यस्थितीला राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४२ वर आहे. अशातच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भातील काही भागात पावसाने आणि गारपीठीने जोरदार हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झालेल्या गारपीटीमुळे मोसंबी, आंबा, डाळिंब, द्राक्ष, गहू, हरभरा, मका अशा रब्बी पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटाने आणि या पावसाने शेतकऱ्यांना आधीच हौस आणि त्यात पडला पाऊस असे म्हणण्याची वेळ आली आहे. परभणी, बुलढाणा, यवतमाळ, जालना, औरंगाबाद या ठिकाणी काल (१७ मार्च) पावसाने हजेरी लावली होती.

शेतकऱ्यांना कायमच अवेळी पावसाचा सामना करावा लागतो. काही दिवसांआधी मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काल रात्री अमरावती, बुलढाणा, जालना यासांरख्या अनेक भागांत झालेल्या गारपीठीने पिकांचे तर नुकसान झालेच पण या भागात काही काळासाठी वीज पुरवठादेखील खंडित करण्यात आला होता. केळी, पपई, टोमॅटो, कापूस, गहू, हरबरा, कांदा, गहू, संत्रा, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता शेतकरी ही समस्या कशी सोडवणार हा एक चिंतेचाच भाग आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना अचानक साक्षात्कार! – राज ठाकरे

Aprna

आज होणार माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्या राजकीय भविष्याचा फैसला

News Desk

माझा बाॅडीगार्ड मारहान केली नाही : एकनाथ शिंदे

News Desk