HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे कॉंग्रेसची नाहक बदनामी, सोनिया आणि राहूल गांधींनी मागवला अहवाल

नवी दिल्ली | कॉंग्रेसच्या दिल्ली हायकमांडनी सध्या महाराष्ट्रात ज्या गोष्टी घडत आहेत त्या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणात कॉंग्रेसटी नाहक बदनामी होत असल्याची मोठ्या नेत्यांची भावना असल्याचं समोर येत आहे.

काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी आज (२३ मार्च) बैठक घेऊन अहवाल मागवला आहे. मुंबईतील बैठकीच्या अहवालावर स्वतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी निर्णय घेणार आहेत. परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणात कॉंग्रेस नाहक बदनाम होत आहे, ही हायकमांडची भूमिका आहे. त्यामुळे कॉंग्रेस आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसची गुपचिळी

परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राष्ट्रवादी आणि सरकारच्या पातळीवर डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारची बाजू लावून धरताना दिसत आहेत. परंतु, या सगळ्यात काँग्रेसचे नेते म्हणावे तितके सक्रिय झालेले नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही या सगळ्यावर फारसे बोलताना दिसत नाही आहेत.

काँग्रेस प्रभारींनी अहवाल मागवला

दिल्लीत काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे या सगळ्या परिस्थितीचा अहवाल मागितला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी रविवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन राज्यातील नेत्यांना यासंदर्भात निर्देश दिले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी या सगळ्यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

…तर कॉंग्रेसने महाराष्ट्र सरकारमधील पाठिंबा काढून घ्यायला हवा

मध्य प्रदेशमधील काँग्रेस आमदार आणि वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह यांनीदेखील याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खरे असल्यास काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून घ्यायला हवं, अशी मागणी त्यांनी केली आहे. लक्ष्मण सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं, की महाराष्ट्राचे गृहमंत्री मुंबई पोलिसांकडून जर १०० कोटी रुपये प्रतिमहिना याप्रमाणं वसूल करत असतील आणि जर हे सत्य असेल तर देशमुख देशाचे मुख होऊ शकत नाहीत. असं दिसत आहे, की आघाडी सरकार पिछाडीवर जात आहे. काँग्रेसनं आपलं समर्थन माघारी घ्यायला हवं, असं म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ७९० नवीन रुग्णांचे निदान, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२ हजार २९६ वर पोहोचली

News Desk

मराठा समाजासाठी ३ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा ! चंद्रकांत पाटलांची मागणी

News Desk

कलम ३७० हटवताना दाखवलेली हिंमत आता मराठा आरक्षणासाठी दाखवा !

News Desk