HW News Marathi
महाराष्ट्र

वसई-विरार महापालिका म्हणते ‘नो कोरोना’

विरार | देशासह राज्यभरात कोरोनाचा विळखा पडलेला असताना वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत मात्र सुदैवाने अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. वसई-विरार महापालिकेने कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी कंबर कसली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला आहे. ‘No Corona’ या मोहिमेअंतर्गत वसई-विरार महापालिकेने स्वच्छतेबरोबरच खबरदारीचे उपाय योजण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

कोरोना व्हायरसची लागण गर्दीच्या ठिकाणी होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये गर्दी सर्वात जास्त असते. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेने सकाळी ९ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ या दरम्यान प्रत्येक फेरीनंतर बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला आहे. या निर्जंतुकीकरणात बाहेरून बसगाड्यांवर स्प्रेची फवारणी, तसेच आतल्या बाजूला हँडल, आसने आणि इतर भाग स्प्रे मारून स्वच्छ करणे यांचा समावेश आहे.

वसई-विरार महापालिकेच्या ताफ्यात सध्या ११० बसगाड्या आहेत. यागाड्या दिवसभरात ४३ मार्गांवर ९८० फेऱ्या मारतात. वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाची दैनंदिन प्रवासी संख्या एक लाखाच्या वर असून त्यात १३ हजार विद्यार्थी आणि १७ हजार ज्येष्ठ नागरिक प्रवाशांचा समावेश आहे. या सर्वांची आरोग्य सुरक्षा ध्यानात घेऊन आता नालासोपारा पूर्व-पश्चिम, वसई पूर्व-पश्चिम आणि विरार पूर्व-पश्चिम या सहा ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रत्येक फेरीनंतर प्रवाशांचा खोळंबा होऊ नये म्हणून प्रत्येक बसमागे १० कर्मचारी हे काम करत आहेत. एक बसगाडी निर्जंतूक करण्यासाठी सात मिनिटांचा अवधी लागत असल्याने प्रवाशांचीही अडचण होत नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये, याकरिता सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी, ती आपली नैतिक जबाबदारी आहे. संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता राखली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळायला हवे. आमचे प्रयत्न सुरू आहेत जास्तीत जास्त गर्दीच्या ठिकाणी केमिकल निर्जंतुकीकरण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. पालिका आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या काळात स्वच्छता दुप्पटीने केली आहे. शिवाय, सोसायटी किंवा खासगी संस्थांना निर्जंतुकीकरणासाठी केमिकल्स उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी दिली.

वसई-विरार विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पूरक सुरक्षा प्रदान करणे, ही सद्यस्थितीला प्राधान्यक्रमाने आमची पहिली जबाबदारी आहे. कोरोना व्हायरस आणि त्यापासून बचाव कसा करावा, याविषयीची जागरूकता शक्य त्या सर्व मार्गांनी पसरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सावधानता म्हणून प्राथमिक स्तरावर सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. अशी माहिती बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी दिले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हुबळी रेल्वे स्थानकाच्या स्फोट, १ जण गंभीर जखमी

News Desk

पालघर, सिंदखेडराजासह लोणार नगरपरिषदेसाठी २४ मार्चला मतदान

News Desk

‘डॉक्टरांचं काम शब्दात सांगण्याजोगं नाही’, उद्धव ठाकरेंचं डॉक्टरांना पत्र

Ruchita Chowdhary