HW News Marathi
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

पुणे । ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात आज (१८ डिसेंबर) ठेवण्यात येणार आहे. उद्या (१९ डिसेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. श्रीराम लागू यांच्या निधनानंतर मराठी चित्रपट आणि हिंदी सिनेसृष्टी शोककळा पसरली आहे.

डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ मध्ये सातारा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेतले. १९५० च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात पाच वर्ष कामही केले. त्यानंतर ते कॅनडा आणि इंग्लंडला पुढील शिक्षणासाठी गेले.

१९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. त्यानंतर १९६९ मध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्र सोडून पूर्णपणे नाटकात काम करण्यास सुरुवात केली. पुण्यातील पी.डी.ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शनही केले.

वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकांमध्ये, मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’ या सिनेमातील लागूंच्या अभिनयानं तर त्यांना घराघरात नेलं. ‘पिंजरा’ सिनेमातील त्यांच्या अभिनयाने ते यशाच्या शिखरावर पोहोचले. ‘पिंजरा’ व्यतिरिक्त त्यांचे ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘मुक्ता’ हे सिनेमेही चांगलेच गाजले. अभिनयाशिवाय डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले. डॉ. लागू यांनी सुमारे १२५ हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राम मंदिरापेक्षा गरीबाच्या पोटात दोन घास जाणे महत्वाचे | नाना पाटेकर

News Desk

मोझॅकच्या माध्यमातून चिमुकल्यांना अनोखी भेट

News Desk

ती एक प्रवाहिका.. काशीबाई कानिटकर

News Desk
महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयने कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठवली

News Desk

मुंबई | कोस्टल रोडला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कोस्टल रोडला दिलेली स्थगिती उठवली आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा विचार करता मुंबईसाठी वाहतुकीचे नवे पर्याय निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी सर्वोच्च न्याायलयाने व्यक्त करत कोस्टल रोडवरील स्थगिती उठवली.

कोस्टल रोडचा प्रकल्प जवळपास १२ हजार कोटींचा आहे. या प्रकल्पासाठी मुंबईतील अनेक ठिकाणच्या किनाऱ्यांवर भराव टाकण्यात येणार आहे.या प्रकल्पाचे दोन टप्प्यात काम पूर्ण होणार आहे. यात पहिला टप्प्यात मुंबई शहरातून जाणाऱ्या प्रकल्पाच्या कामाची संपूर्ण जबाबदारी महापालिकेने घेतली होती. या प्रकल्पाचे बांधकामसुद्धा महापालिकेच्या देखरेखीखाली सुरू होते. पर्यावरणवाद्यांनी मुंबईत उच्च न्यायालयात याचिका करून या प्रकल्पाला स्थगिती मिळवली होती.

ही स्थगिती उठवताना केवळ या रस्त्याचे काम करण्यास परवानगी देत आहोत, त्यामुळे प्रकल्पाशेजारची इतर विकासकामे सुरु करु नका, असे स्पष्ट निर्देश देखील सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने दिले.

Related posts

‘आपल ते बाब्या, दुसऱ्याच ते कारट’ नीलम गोऱ्हे यांची भाजपावर सनसनीत टीका!

News Desk

वस्तुस्वरुपात मिळणारा शासकीय लाभ आता रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात होणार जमा         

News Desk

माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही? उदयनराजेंचा भुजबळांना सवाल  

News Desk