HW News Marathi
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

पुणे । ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात आज (१८ डिसेंबर) ठेवण्यात येणार आहे. उद्या (१९ डिसेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. श्रीराम लागू यांच्या निधनानंतर मराठी चित्रपट आणि हिंदी सिनेसृष्टी शोककळा पसरली आहे.

डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ मध्ये सातारा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेतले. १९५० च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात पाच वर्ष कामही केले. त्यानंतर ते कॅनडा आणि इंग्लंडला पुढील शिक्षणासाठी गेले.

१९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. त्यानंतर १९६९ मध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्र सोडून पूर्णपणे नाटकात काम करण्यास सुरुवात केली. पुण्यातील पी.डी.ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शनही केले.

वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकांमध्ये, मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’ या सिनेमातील लागूंच्या अभिनयानं तर त्यांना घराघरात नेलं. ‘पिंजरा’ सिनेमातील त्यांच्या अभिनयाने ते यशाच्या शिखरावर पोहोचले. ‘पिंजरा’ व्यतिरिक्त त्यांचे ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘मुक्ता’ हे सिनेमेही चांगलेच गाजले. अभिनयाशिवाय डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले. डॉ. लागू यांनी सुमारे १२५ हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आयुष्यमान आणि भूमीची कंडोम राइड

News Desk

कपिल खोटं बोलतोय..

News Desk

पुढच्या वर्षी लवकर या! बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात

News Desk
राजकारण

#RamMandir : विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राम मंदिरासाठी कायदा करण्यास अडचण !

News Desk

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी राम मंदिरावरून सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठावर जोरदार टीका केली आहे. ‘राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचा कायदा आणण्याचा विचार आहे. मात्र, विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अडचण होत आहे’ असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि न्यायाधीशांनी काहीही केले असून न्यायालय या प्रकरणी गंभीर नाही. मंगळवारी (२७ नोव्हेंबर) पंजाब विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जोशी फाऊंडेशनच्या वतीने ‘राम जन्मभूमीवर अन्याय का?’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या सदस्यांनी न्याय नाकारल्याने आमच्या वेदना वाढत आहेत. ‘जर तुम्ही न्याय द्यायला तयार नसाल तर न्यायाधीश पदावर आपण रहावं की राजीनामा द्यावा याचा विचार त्यांनी करायला हवा’, अशा शब्दांत अयोध्या प्रकरणी सुनावणीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय खंडपीठावर टीका केली आहे. देश इतका अपंग झालाय का? की, दोन-तीन न्यायाधीश देशातील लोकांचा विश्वास, लोकशाही, संविधान आणि मूलभूत अधिकारांना थांबवू शकतात.’ असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.

Related posts

मला आजही पंतप्रधान मोदींची जात माहित नाही !

News Desk

फडणवीस सरकारचा कहर, दुष्काळाची पाहणी टॉर्चच्या प्रकाशात

swarit

मोदी सरकारला लष्कराच्या इतिहासाबाबत माहिती नाही !

News Desk