HW News Marathi
देश / विदेश

विकास दुबे चकमक प्रकरण म्हणजे आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा पोलिसांनी घेतलेला सूड आहे

मुंबई | आज (१० जुलै) उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड विकास दुबेला ठार केले. संजय राऊत यांनी सामना कार्यालयात प्रसारमाध्यामांशी आज संवाद साधला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून हा पोलिसांनी घेतलेला सूड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी यावेळी चकमकीचं समर्थन केले नाही तरी पोलिसांचे खच्चीकरण करणारी वक्तव्ये केली जाऊ नयेत असे आवाहन केले आहे. काही लोकांची नावे बाहेर येऊ नयेत यासाठी विकास दुबेला ठार केल्याच्या आरोपावर बोलताना संजय राऊत यांनी, मला असे वाटत नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा पोलिसांनी घेतलेला हा सूड आहे.

“हा उत्तर प्रदेश किंवा योगींचा प्रश्न नाही. देशाच्या कोणत्याही राज्यात असे झाले तर पोलीस त्याला जिवंत सोडणार नाहीत. पोलीस आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला नेहमी घेतं. जे झालंय त्याचं राजकारण होता कामा नये,” असं आवाहन यावेळी संजय राऊत यांनी केले.

“अशा घटना याआधीही देशात झाल्या आहेत. मुंबईत तर आपल्याकडे अनेक एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांच्यावर चित्रपटही आले आहेत. दिल्ली, हैदराबादमध्येही अशा चकमकी झाल्या आहेत. मी खोट्या चकमकीचं कधी समर्थन केलं नाही आणि करणारही नाही. पण जर पोलिसांची हत्या झाली असेल, पोलिसांची प्रतिष्ठा आणि भीती राहिली नसेल तर देशात कायदा-सुव्यवस्था राहणार नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“विकास दुबेसारखी लोकं निर्माण केली जातात ती अनेक राजकारण्यांची गरज असते. निवडणुका जिंकण्यासाठी, खंडणी गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी असे लोक काही राज्यात पोलीस, राजकारणी तयार करतात. विकास दुबेही अनेक पक्षांशी संबंधित होता. याला राजकारण जबाबदार आहे. आधी राजकारणी गुन्हेगारांचा वापर करुन घेत होते. आता गुन्हेगार राजकारणात येत आहेत. गुन्हेगारीचे राजकारण होणे धोकादायक आहे,” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकसभेत अमोल कोल्हेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊन वेधले लक्ष!

News Desk

देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच ३ वाघांचा बळी

Gauri Tilekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करत शरद पवारांच्या तब्येतीची केली विचारपूस

News Desk