HW News Marathi
महाराष्ट्र

कोकणातील प्रकल्प लातूरला नेण्याच्या मागणीवरून शिवसेना खासदाराचा अमित देशमुखांना टोला

मुंबई | वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोकणातील प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केली आहे. त्यावरून आता देशमुख यांच्यावर त्यांच्याच आघाडी सरकारमधील नेत्यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडीत प्रकल्पांची पळवापळवी होऊ नये,वरिष्ठांनी याबाबत मध्यस्थी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. पुन्हा एकदा आघाडी सरकारमधील असमन्वय पुढे आला आहे. या आधी देखील अनेक विषयांवर सरकारमधील पक्षांत आणि पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले होत. ते आता पुन्हा दिसून आले आहे.

विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित देशमुख यांच्या मागणीवर तीव्र नापसंती व्यक्त केली. महाविकास आघाडीत प्रकल्पांची पळवापळव होऊ नये. यासाठी वरिष्ठांनी मध्यस्थी करावी. वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यास आघाडीत समन्वय राहील, असे विनायक राऊत म्हणाले आहेत.

सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. या संदर्भात पत्रव्यवहार केला असता त्याला उत्तरंही देण्यात आली नाही, अशी टीका नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट लातूरला नेण्याची मागणी केली होती. त्यावरून राऊत यांनी नाराजी व्यक्त केल्याने आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालिका आणि बेबी पॅंग्विनच्या कामाबद्दल बोलणारे सेलिब्रिटी पावसाबद्दल काही बोलणार का? नितेश राणेंनी धरलं धारेवर

News Desk

#Coronavirus : धक्कादायक ! पुण्यात ४ तासांत ४ जणांचा मृत्यू

News Desk

बाळासाहेब ठाकरेंनी जी सेना निर्माण केली ती आता ‘सोनिया सेना’ झाली!

News Desk