HW News Marathi
महाराष्ट्र

आपण जेथे आहात तेथेच थांबा, सरकार आपली सर्व काळजी घेईल !

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे कामासाठी हजारोंच्या संख्येंने महाराष्ट्रात आलेले कामगार आणि मंजूर हे आता पायीपीठ करत स्थलांतर करत आहे. यावर “आपण जेथे आहात तेथेच थांबा. सरकार आपली सर्व काळजी घेईल”, असे आवाहन स्थलांतर करणाऱ्या राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत केले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने हेल्पलाईन जाहीर केल्या आहेत, त्यांच्यासोबत संपर्क करा. अत्यावश्यक सुविधा ते आपल्याला पुरवण्यात येईल, असे ट्वीटमध्ये म्हटले.

बाळासाहेब थोरात यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, बऱ्याच नागरिकांकडून त्यांचे नातेवाईक वेगवेगळ्या भागात किंवा परराज्यात अडकले आहेत असे फोन येत आहेत, पराराज्यातूनही काही मान्यवरांचे फोन येताहेत त्यांचे काही लोक महाराष्ट्रात अडकले आहेत. माझी विनंती आहे, आपण जेथे आहात तेथेच थांबा. सरकार आपली सर्व काळजी घेईल. “महाराष्ट्र सरकारने हेल्पलाईन जाहीर केल्या आहेत, त्यांच्यासोबत संपर्क करा. अत्यावश्यक सुविधा ते आपल्याला पुरवतील. परराज्यात जे महाराष्ट्रीयन आहेत, त्यांची माहितीही कळवा. त्या राज्यातील स्थानिक प्रशासनाशी संपर्क करून तेथे अडकलेल्या आपल्या बांधवाना जीवनावश्यक सेवा पुरविल्या जातील,” असे दुसऱ्याट्वीटमध्ये म्हणाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र आणि राज्य असा भेदभाव योग्य नाही – रोहित पवार

News Desk

आता तर मोदी सरदार पटेलांपेक्षाही मोठे वाटायला लागलेत, राऊतांचा मोदींना उपरोधिक टोला

News Desk

“आमचा लढा वाडाविरोध गावगाडा”, म्हणत सदाभाऊ खोतांनी केतकीचे केले समर्थन

Aprna