HW News Marathi
देश / विदेश

आम्ही फक्त तीनच राजांना मानतो ! प्रकाश आंबेडकरांचे नवे विधान

मुंबई | “आम्ही फक्त तीनच राजांना मानतो. ते म्हणजे राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज.”, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकरण पेटले आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रकाश आंबेडकरांनी भाजप नेते उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. प्रकाश आंबेडकरांच्या दोन्ही राजांवरील टीकेने मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला आहे. त्यानंतर आता पुन्हा एका आंबेडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्यत्तर दिले आहे.

प्रकाश आंबेडकर आपल्या ट्विटमध्ये म्हणारा की, “राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे आणि ती कायम राहील, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंबेडकर आणि राजेंममधला वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.” दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेने आता पुन्हा राजकारण पेटणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाची जय्यत तयारी सुरू !

News Desk

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार

Aprna

डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक, वीचॅटवर बंदी घालणाऱ्या आदेशावर केली सही

News Desk