HW News Marathi
महाराष्ट्र

जालियनवाला बाग हत्याकांडानंतर पंजाबमध्ये लागू केलेला ‘मार्शल लॉ’ म्हणजे काय ?

रसिका शिंदे | १३ एप्रिल १९१९, भारताच्या इतिहात मानवतेला काळीमा फासणारा तो दिवस. अमृतसर येथील जालियनवाला बागेत सर्व शीख बांधव बैसाखी सणाच्या निमित्ताने तेथे जमले होते. ही माहिती ब्रिटिश अधिकारी जनरल डायरला समजली आणि तो त्याच्या फौजेसह जालियनवाला बागेत हजर झाला. त्याने त्याच्या तुकडीला आदेश दिले की जोपर्यंत तुमच्या बंदुकीतील गोळ्या संपत नाही तोपर्यंत होळीबार करत राहा. आणि बघता बघता गोळीबार सुरु झाला आणि प्रत्येकजण आपला प्राण वाचवण्यासाठी इतरत्र पळायला लागले. बागेच्या दरवाज्यावरही गोळीबारासाठी तुकड्या तैनात होत्या. परंतू फार कमी जणं या प्रवेशद्वारातून बाहेर पडू शकले.

काही जणांनी तिथे असलेल्या विहिरीत उड्या मारल्या. महिला, लहान मुले सगळ्यांनीच प्राण वाचवण्यासाठी जो मार्ग दिसला तो स्वीकारला. मात्र, विहिरीत इतक्या जणांनी उड्या घेतल्याने गुदमरुनही अनेकांनी प्राण गमावले. दरम्यान, या अमानुष कृत्यानंतर ब्रिटीश सरकारने जनरल डायरला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला शिक्षा देण्यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव आणला त्यामूळे डायरने आपला राजीनामा सरकारकडे सुपूर्द केला. मात्र, इतक्या भयावह आणि अमानुष गुन्ह्याची त्याला कठोर शिक्षा ब्रिटीश सरकराने दिली नाही. त्यानंतर या भयावह घटनेनंतर पंजाबमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला.

मार्शल लॉ म्हणजे काय?

मार्शल लॉ ही एक अशी न्याय व्यवस्था आहे ज्यात सरकार सर्व अधिकार हे सैन्याकडे देते. यात संपूर्ण देशाचा अधिकार देण्याची गरज नसते तर काही ठराविक क्षेत्र, राज्य किंवा जिल्हा हा सैन्याच्या हवाली करण्यात येतो. जिथे सैन्य दल त्यांच्यापरिने आलेल्या संकटाचा सामना करतात. मार्शल लॉ ला सैन्य कायदा असेही म्हटले जाते. तसेच, विशिष्ट परिस्थितीत कोणत्याही देशाची न्यायव्यवस्था जेव्हा सैन्यदल आपल्या अधिपत्याखाली घेते, तेव्हा जो नियम लागू होतो त्याला ‘मार्शल लॉ’ असे म्हटले जाते. कधी कधी हा कायदा युद्धप्रसंगी किंवा कोणतेही क्षेत्र जिंकल्यावर लागू करण्यात येतो. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमध्ये हा कायदा लागू करण्यात आला होता. आतापर्यंत पाकिस्तानात ४ वेळा मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे.

केव्हा मार्शल लॉ लागू करण्यात येतो ?

देशात महत्त्वाच्या घटनेवरून नागरिकांमध्ये असंतोष उफाळला, राष्ट्रीय संकट ओढवले, किंवा प्रांतवाद निर्माण झाला, तर अशा परिस्थितीत मार्शल लॉ लागू करण्यात येतो. यामध्ये सैन्यदलाकडे सर्व जबाबदारी सोपवण्यात येते. संपूर्ण देशभरात हा कायदा लागू करणे आवश्यक नसते, तर गरजेनुसार संबंधित क्षेत्रात, राज्यात अथवा जिल्ह्यांत मार्शल लॉ लागू करण्यात येतो. ज्या देशात मार्शल लॉ लागू केला जातो तेथे सैन्यदल सर्व यंत्रणा ताब्यात घेते.

मार्शल लॉचा अर्थ युद्धाची सुरुवात करणे असा होत नाही. शासनाची जी सामान्य नागरी कार्ये असतात, म्हणजेच नागरी व्यवस्थेला दूर करून तेथे मिलिट्रीचे नियम लागू केले जातात. सत्ताबदलानंतर मार्शल लॉ लागू केला जातो. कधी-कधी मोठ्या स्वरूपातील नैसर्गिक आपत्तीनंतर हा कायदा लावण्यात येतो. परंतु बहुतांश देशात अशा स्थितीत इमर्जन्सीही लागू करण्यात येते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पूजाने आई-वडिलांचं ऐकलं असतं तर…”, पूजा चव्हाणच्या आजी-आजोबांची प्रतिक्रिया

News Desk

“संत संजय राठोड लगे रहो”, नारायण राणेंची खोचक टीका  

News Desk

राणेंची जुनी प्रकरणं राज्य सरकार पुढे काढणार !

News Desk