HW News Marathi
महाराष्ट्र

“शिवसेनेच्या ओठात काय आणि पोटात काय”, नवनीत राणांची ठाकरे सरकारवर सणसणीत टीका!

मुंबई। आज केंद्रामध्ये ओबीसींच्या हितार्थ एक बिल आणण्यात आले आहे. या बिलाला राज्य सरकारने समर्थन देऊन ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करायला पाहिजे असा अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारला केली आहे. तर शिवसेनेच्या पोटात काय आणि ओठात काय असा टोला देखील खासदार नवनीत राणा यांनी लगावला आहे. केंद्र सरकारने ओबीसींच्या हितार्थ हे बिल आणले होते या बिलाला राज्य सरकारने शिवसेनेच्या खासदारांनी समर्थन करायला पाहिजे होतं. मात्र शिवसेना फक्त ओरडण्याच काम करत असल्याचा टोला खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारला लगावला आहे. केंद्र सरकारने ज्याप्रमाणे ओबीसींना न्याय देण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याच्या त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही ओबीसींच्या न्यायासाठी आता पुढे येण्याची गरज असल्याचं नवनीत राणा यांनी म्हंटल आहे.

अमित शहा यांची भेट

मागील काही आठवड्यांपासून राज्यातील नेत्यांच्या राष्ट्रीय नेत्यांशी आणि केंद्रीय मंत्र्यांशी भेटीगाठी वाढल्याचं दिसून येत आहे. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत विविध नेते हे दिल्लीत भेटीगाठी घेत आहेत. अशातच आता राणा दाम्पत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा

‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन केली महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा, महाराष्ट्रात आलेला महापूर, अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले व केंद्राने महाराष्ट्रातील पुरपीडितांना भरीव मदत दयावी अशी मागणी केली. महाराष्ट्राच्या या संकटसमयी अमित शाह यांनी तातडीने केंद्रातर्फे एन.डी.आर.एफ. चे बचाव पथक पाठविले ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचविले व केंद्राने तात्काळ 700 कोटींची मदत राज्याला दिली याबद्दल अमितजी शाह यांचे आभार मानले,’ असं ट्विट रवी राणा यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तळीयेच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली म्हाडाने’ जितेंद्र आव्हाडांची माहिती…!

News Desk

काँग्रेसचे २५ हून अधिक आमदार भाजपच्या संपर्कात | गिरीश महाजन

News Desk

Maratha Reservation | मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार

News Desk